Wednesday, 30 July 2008

राहून गेलं

धपकन प्रेमात पडतांना, तिला प्रेमात पाडायचं राहून गेलं,
तोंड दुखेपर्यंत बडबडतांना, हवं ते सांगायचं राहून गेलं.
ती हो म्हणेल की नाही म्हणेल की देईल ठेवून एक मुस्काटात,
हा अशुभ विचार करता-करता हवं ते घडायचं राहून गेलं.
नुसताच बघत बसे मी तिच्या काळ्याभोर डोळ्यांमध्ये
तिच्या डोळ्यात स्वतःला शोधतांना माझ्याविना तिचं अडायचं राहून गेलं.
तिच्या ओढणीचा, खांद्याचा स्पर्श हवा-हवासा वाटतसे नेहमी,
सांगीन तिला कधीतरी म्हणतांना हा विषय काढायचं राहून गेलं.
प्रत्येक भेटीनंतर ती जातांना घालमेल जीवाची असह्य होई,
त्या दिवशीही ती निघाली अन तिला अडवायचं राहून गेलं


--चेतन बच्छाव

कॉलेज लाइफ़

कॉलेज लाइफ़ माझं "
कँटीन मधला चहा आणि
चहा सोबत वडा पाव
पैसे कुठ्ले खिशात तेव्हा
उधारीचचं खातं राव !

कट्ट्यावर बसणं लेक्चर चुकवून
आणि पोरींची चेष्टा करणं
दिसलीच एखादी चांगली तर
तिला लांबूनच बघून झुरणं !


बसलोच चुकून लेक्चरला तर
शेवटचा बाक ठरलेला
कुणाच्या तरी वहीतलं पानं
आणि पेन सुध्दा चोरलेला !

परिक्षा जवळ आली
कि मात्र रात्री जागायच्या
डोळ्यात स्वप्नं उद्याची
म्हणून झोपाही शहाण्यासारख्या वागायच्या !

पूर्ण व्हायचं एक वर्तुळ
एक वर्ष सरायचं
पुन्हा नव्या पाखरांसोबत
जुनं झाड भरायचं.

अशी वर्तुळ भरता भरता कळलं
अरे कागदच भरला !
वर्तुळ झाल्या कागदाला
फ़क्त सलाम करायचा उरला !!

पुन्हा नविन रस्ता
पुन्हा नविन साथी
जुन्या रस्त्याच्या , प्रवासाच्या
फ़क्त आठवणीच हाती !!!!!!


'नातं '

मैत्री केली आहेस म्हणुन तुला सांगावस वाटतय


गरज म्हणून 'नातं ' कधी जोडू नकोस
सोय म्हणून सहज असं तोडू नकोस..

रक्ताचं नाही म्हणून, कवडीमोल ठरवू नकोस
भावनांचं मोल जाण..मोठेपणात हरवू नकोस..

आयुष्याच्या प्रत्येक वळणात नवं नातं जुळत असतं
जन्मभर पुरेल इतकं भरून प्रेम मिळत असतं..

तुझी ओंजळ पुढे कर, कमीपणा मानू नकोस
व्यवहारातलं देणं घेणं फक्तं मध्ये आणू नकोस..


मिळेल तितकं घेत रहा, जमेल तितकं देत रहा
दिलं घेतलं सरेल तेव्हा.. पुन्हा मागून घेत रहा..

समाधानात तडजोड असते...फक्त जरा समजून घे
'नातं ' म्हणजे ओझं नाही, मनापासून उमजून घे..

विश्वासाचे चार शब्दं..दुसरं काही देऊ नकोस
जाणीवपूर्वक 'नातं ' जप.. मध्येच माघार घेऊ नकोस......

आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....

गंध आवडला फुलाचा म्हणून... ... फूल मागायचं नसतं.

गंध आवडला फुलाचा म्हणून
फूल मागायचं नसतं
अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....

परक्यांपेक्षा आपलीच माणसं
आपल्याला नेहमी दगा देतात
एकमेकांच्या पाठीवर मग्
नजरे आडून वार होतात

भळभळणा-या जखमेतून
विश्वास घाताचं रक्त वाहतं
छिन्नविछीन्न जखमेला तेव्हा
आपणच पुसायचं असतं


अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....


आपलं सुःख पाहण्याचा तसा
प्रत्येकाला अधिकार आहे..
पण्; दुस-याला मारुन जगणं
हा कुठला न्याय आहे...

माणूस म्हणुन माणसावर
खरं प्रेम करायचं
आपल्या साठी थोडं,
थोडं दुस-यासाठी जगायचं


जगण्याचं हे ध्येय मनात आपणच बाणवायचं आसतं
अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....


आपल्याला कोणी आवडणं
हे प्रत्येक वेळी च प्रेम नसतं
आकर्षणाचं स्वप्नं ते
आकर्षणंच असतं...


मान्य आहे,
आकर्षणात प्रेम केव्हा केव्हा दिसतं...
पण् जे चकाकतं
ते प्रत्येक् वेळीच् सोनं नसतं
मन् आपलं वेडं असतं
वेडं आपण व्हायचं नसतं..
मन मारुन जगण्यापेक्षा

अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं अस

--चेतन बच्छाव

प्रेम

कीतीही सुदर मुलगी दीसली
तरी,
तीची स्तुती करुन तीला
हरबरयाच्या झाडावर
चढ्वायला
आम्हाला कधी जमलेच नाही
म्हणुन आम्हाला प्रेम
करायला अजुन जमलेच नाही

कोणाच्या मागे
शीट्ट्यामारत फीरण
आमच्या तत्वात कधी बसलेच
नाही
म्हणुन आम्हाला प्रेम
करायला अजुन जमलेच नाही

कोणी जर आवड्लीच तर
स्वतः हुन गप्पांना सुरवात
करायला
आम्हाला कधी जमलेच नाही
म्हणुन आम्हाला प्रेम
करायला अजुन जमलेच नाही

दुसरयाचे वीचार ऎकत
असतांना
आपले वीचार मांडण्याचि
संधी
आम्हाला कधी साधताच आली
नाही
म्हणुन आम्हाला प्रेम
करायला अजुन जमलेच नाही

कधी हीमत करुन कोणाला जर
वीचारलेच
तर मी तुला त्या
द्रुषटीनीकधी बघीतलेच नाही
या व्यतीरीक्त दुसरे काही
आम्हाला ऎकायलाच मीळाले नाही
म्हणुन आम्हाला प्रेम
करायला अजुन जमलेच नाही

प्रेमात नाहीचा अर्थ हो
असतो
हे गणीत आम्हाल कधी समजलेच
नाही
म्हणुन आम्हाला प्रेम
करायला अजुन जमलेच नाही

फुलपाखरा प्रमाणे आम्ही ही
बरयाच सुदर फुलां मधे
वाव्ररत होतो
पण जाउन बसन्यासारखे फुल
अजुन आम्हाला दीसलेच नाही


दारु

दारु चढल्यावर ची खास वाक्ये
१. तु माझा भाउ आहे.. घाबरायच नाही.
२.भीडु आपल्याला बिलकुल चाढली नाही..
३. गाडि मी चालवणार, तु मुकाट पणे माग बसायच.
५. तु आपल्या बोलण्याच मनावर नाय घ्यायच.

६. भाउ, आपण तुला मनापासुन मान्तो. तु लै भारी
७. चल आज सुनाव त्याला.. काय होइल ते बघुन घेउ....
८. आज फक्त तिच्या बरोबर बोलायला साठी री चार्ज केला आहे....
९. तुला काय वाटत मला चढली आहे?
१०. अस समजु नको कि मी पीलोय म्हणुन बोलतो आहे...
११. अरे यार येवढी पुरेल ना, कमी नाय ना पडनार......
१२. मी लास्ट पेग बॉटम अप करणार....
१३. यार तु अजुन नको पीउ.. तेरे को चड गई है..
१४. य़ार काही म्हण तु आज तुझ बोलण मनाला लागल...
१५. कही पण आसो.. साला तु आपला भाऊ आहेस...
१६. तु बोलना भाई, काय पाहीजे जान चाहिये हाज़िर है ???
१७.अबे आपल्याला आज पर्यंत नाही चढली ,चल साल्या बेट लाव आज..
१८. चल बोलतो तिच्याशी तुझ्या बद्द्ल , फोने नंबर दे उस्का...
१९ य़ार आज उसकि बहुत याद आ रहि है
२०. य़ार आता बस ,आत नाही प्यायच...
२१. य़ार तु आपला सर्वात जिगरी दोस्त... आज से हमारे बीच में कोइ पोरगी नहि अयेगि

आठवण

हसता हसता
हसता हसता डोळे अलगद येतीलही भरून
बोलता बोलता शब्द ओठी जतीलही विरुन
कावरंबावरं होण्यासारखं बिलकुल काही नाही
कुणीतरी आठवण काढतयं, बाकी काही नाही

मोबईल वाजण्याआधीच तो वाजल्यासारखा वाटेल
जुनाच काढुन एसएमएस वाचवासा वाटेल
दिवस सरता वाटत जाईल उगाचच उदास
पावलोपावली जड होत जाईल बहुधा श्वास
घाबरुन बिबरुन जाण्यासारखं बिलकुल काही नाही
कुणीतरी आठवण काढतंय, बाकी काही नाही

जेवता जेवता जीवघेणा लागेलही ठसका
घरचे म्हणतील सारखा कसा लागतो उठता बसता
चेहरा लपवत, डोळे पुसत, पाणी प्यावे थोडे
बोलण्याआधी आवाजाला, सांभाळावे थोडे
सांगुन द्यावं काळजीसारखं बिलकुल काही नाही
"कुणीतरी आठवण काढतंय, बाकी काही नाही !!

हसायच्या आधी मला
जरा सराव करावा लागतो,
मनावरचा घाव बराच
दाबून धरावा लागतो ...............

--चेतन बच्छाव

फोन

फोनची बेल वाजते. (तो चुकीचा क्रमांक लागलेला असतो.)

पहिला(फोन करणारा पुणेरी) : हेलौ..

दुसरा : बोला.


पहिला : देशपांडे आहेत का ?

दुसरा(चिडून) : नाही, ते 'पावन खिंडीत' लढतायेत!

पहिला : मग त्यांना सांगा राजे गडावर पोचले. आता मेलात तरी चालेल.

(फोन बंद)

मुली मुली मुली मुली

मुली मुली मुली मुली

देव चुकुन ज्यांचात अक्कल भरण्याच विसरला अशी त्याची रचना म्हणजे मुली.
फिरायला, कॉलेजला जाताना, सोबत असावी म्हणून मैत्री करणार्‍या त्या मुली.
"मी तिच्यापेक्ष्या जास्त सुंदर आहे " असा उगाच गोड गैरसमज मनाशी बाळगून असलेल्या त्या मुली.
जरी असतील room mate आणि दिसत असतील घट्टा मैत्रिणी, तरी मनात असते इरशा खुन्नस.
आमची चुकुन पडणारी नजर केवळ आपले सौंदर्या न्यहलण्यासाठीच पडलिये आशय संभ्रमात वावरणर्‍या मुली.
मुली म्हणजे नाटणमुरडन.
मुली म्हणजे उगाच हसने.

(त्याना हसवायच म्हणजे PJ च मारावे लागतात ,शाब्दिक कोट्या बौधहिक विनोद त्याना झेपत नाहीत)
मुली म्हणजे अय्या इश्शा
मुली म्हणजे लटका गुस्सा
मुली असतात व्यवहार शून्य
दुनियदारी काळत नाही
हे सरकार मान्य.
मुली म्हणजे वैतागवाडी
eyebrows, मेहेन्डी, स्लीवलेस, साडी पर्स लिपस्टिक मेकअप पार्लर ,नाना झंझटि
मुली असतात फूल 2 फिल्मी
आधी आपलस करून नंतर बनतात जुलमी

मैत्री

मैत्री ठरवून होत नाही हाच मैत्रीचा फ़ायदा आहे,

मैत्रीला कुठले नियम नाहीत हा मैत्रीचा पहिला कायदा आहे....

मैत्रीची वाट आहे कठिण पण तितकीच छान आहे,

आयुष्याच्या कुडीचा मैत्रीच तर प्राण आहे....


मैत्रीमध्ये जरुरी नाही दररोजची भेट,

ह्रदयाचा ह्रदयाशी संवाद असता थेट....

तुझी-माझी मैत्री म्हण्जे आयुष्याचा ठेवा,

मुखवट्यांच्या गर्दीमधला खात्रीचा विसावा

महाराष्ट्र माझा

लाल काळी माती इथली
अठरापगड जाती
कणखर आहेत मनं अमुची
फडके झेंडा जगी

शिवरायाचे वारस आम्ही
कृष्णा कोयना माता
विठुराया तर बाप अमुचा
सह्याद्री आहे सखा


इथे जन्मला शेर शिवबा
इथे जन्मली गानकोकिळा
इथेच जन्मले लोकमान्य अन
इथे जन्मले ग्यानबा तुका

अभेद्य आहे अजोड आहे
आहे महाराष्ट्र अमुचा
इथे जन्मलो इथे वाढलो
पावन झाला जन्म अमुचा

अखंड वादळे झेलीत राहील
महाराष्ट्र माझा
शतकानुशतके असाच राहील
महाराष्ट्र माझा


शब्द

शब्दात जगताना
शब्दच सर्वस्व बनते
विसर पडतो वास्तविक जगाचा
शब्दातच मन रमते

शब्दच मनाशी भांड्तात
हळूच मग कागदावर सांडतात
शब्दच बनतात खरा सखा
साथ देतात सुख अन दु:खा

शब्द कधी होतात
पावसाची धार
कधी होतात वार्‍याची
झुळुक गार
कधी गोंजरतात मनाला
हळूवार स्पर्शानी
कधी जखमी करतात
धारदार शस्त्रावानी


--चेतन बच्छाव

होळी आली रे

होळी आली रे
गुलाबी रन्ग प्रेमाचा, लाल रन्ग रागाचा

निळा रन्ग शांततेचा,पिवळा रन्ग उत्साहाचा,

भगवा रन्ग विरक्ततेचा, हिरवा रन्ग आसक्तीचा,

काळा रन्ग गूढतेचा, पांढरा रन्ग निर्मलतेचा,

जीवनात सगळ्या रंगांची उधळण करा,


फक्त हे सगळे रन्ग एकत्र करताना जरा काळजी घ्या,

सगळे रन्ग नको तसे मिसळले तर तो गढूळ रन्ग होतो,

मनाच मात्र तसा होऊ देऊ नका,

मस्त रन्ग उधलत रहा

जीवनाचा आनंद लुटत रहा.

गर्लफ्रेण्ड नसण्याचे फायदे

गर्लफ्रेण्ड नसण्याचे फायदे

1. तुम्ही कोणाही मुलीला बिंधास्त निरखू शकता.

2. तुमचा तिच्यावर खर्च होणारा पैसा वाचतो.

3. अभ्यासावर लक्ष केंदित होऊ लागल्याने परीक्षेत तुम्हाला बरे मार्क मिळू लागतात.

4. इमोशनल ब्लॅकमेलिंग केले जाण्याचा धोका संपतो.


5. गर्लफ्रेंडच नसल्याने तिने 'डिच' करण्याचा प्रश्ान् उरत नाही.

6. फोनच्या रिंगपेक्षा महत्त्वाचे असे आयुष्यात बरेच काही असते, याचा साक्षात्कार होईल.

7. तुमच्यासाठी चांगले-वाईट काय हे दुसऱ्या कुणीतरी ठरवण्यातून तुमची मुक्तता होईल.

8. तुम्ही आयुष्यातल्या अन्य व्यक्तींसाठीही (उदाहरणार्थ आई, बाबा, बहीण, भाऊ) भेटवस्तू घेऊ शकाल.

9. प्रेमपत्र-सत्र थांबल्याने कागद वाचेल, त्यामुळे काही झाडे वाचतील.

10. रड्या प्रेमकथांऐवजी अॅक्शन फिल्म पाहण्याचं स्वातंत्र्य मिळेल.

11. थापांच्या पापातून सुटका होईल.

12. स्वप्नांचा 'व्यत्यय' संपल्याने झोप छान लागेल.


मला पुन्हा एकदा ....

मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.
धावत जाऊन माझ्या रोजच्या बाकावर बसायचय
रोज सकाळी खड्या आवाजात राष्ट्रगीत म्हाणायचाय
नव्या वहिचा वास घेत पहिल्या पानावर
छान अक्षरात आपल नाव लिहायचाय
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय...



कितीहि जड असुदे... जबाबदारीच्या ओझ्यापेक्षा
दप्तराच ओझ पाठिवर वागवायचय,
कितीहि उकडत असू दे.. वातानुकूलित ऒफ़िसपेक्षा
पन्खे नसलेल्य वर्गात खिड्क्या उघडून बसायचय,
कितीहि तुटका असु दे.. ऒफ़िसमधल्या एकट्या खुर्चिपेक्षा
दोघान्च्या बाकावर ३ मित्रान्नी बसायचय,
"बालपण देगा देवा" या तुकारामान्च्या अभन्गाचा अर्थ
आता थोडा कळायला लागलाय,
तो बरोबर आहे ना.. हे विचारयला...
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय


Tuesday, 29 July 2008

कशी वाटली कविता ????????????

तू सूई,मी दोरा.

तू काळी,मी गोरा.


तू पोळी,मी भात.

तू FOOTBALL,मी लात.


तू बशी,मी कप.

तू उशी,मी झोप.


तू BALL,मी BAT,

तू उंदीर,मी CAT.


मी मुंगळा,तू मुंगी.

तू साडी,मी लूंगी.


तू लव,मी प्रेम.

तू फोटो,मी फ़्रेम.


तू डोक,मी केस.

तू साबण,मी फ़ेस.


तू निसर्ग,मी फ़िजा.

तू कविता,"मी माझा"


तू घूबड,मी पंख.

तू विंचू,मी डंख.


तू सांबर,मी डोसा.

तू BOXER, मी ठोसा.


तू कणिक,मी पोळी.

तू औषध,मी गोळी.


तू PETROL, मी CAR,

तू दारु,मी बार.


तू दूध,मी साय.

तू केस,मी डाय.


तू चहा,मी लस्सी.

तू कुमकुम,मी जस्सी.


तू तूप,मी लोणी.

तू द्रविड,मी धोणी.


तू बर्फ़ी,मी पेढा.

तू बावळट,मी वेडा.


तू COMPUTER,मी CD

तू CIGARETTE,मी बीडी.


तू COMPUTER,मी मेल.

तू निरंजन,मी तेल.


तू TIGER,मी LION,

तू DADAR,मी SION.


तू टक्क्ल,मी केस.

तू CANTEEN,मी मेस.


तू केस,मी कोंडा.

तू दगड,मी धोंडा .

कशी वाटली कविता ? .................................

सरळ हो म्हण अन हो मोकळी...

जरा कुठे लागताच माझी चाहूल
उभी असतेस पडद्यामागे वेळी-अवेळी
माझ्या गच्चीकडे पहात परवा
डहाळीच तोडलीस समजून चाफ़ेकळी

तु किती जरी नाही म्हणाली
माझी स्वप्न छळतात तुला रात्रवेळी
लालबुंद अवजड डोळे तुझे
खरी कहाणी सांगतात मला सकाळी

माझ्या सादेची प्रतीक्षा म्हणजे
हाही वसंत सुका जाणार का ग मुली
मी हा असा मुखदुर्बल अबोल
स्वतः होऊन बोलणार आहे का मुळी

जरी आमचा अटकेपार झेंडा
राजसभेत मारे ढाण्या वाघाची डरकाळी
पण कसं अन कुणास ठावूक,
तू समोर दिसताच, होतो आम्ही शेळी

पृथ्वीराजानं या संयुक्तेला वरावं
असेल जरी तुझी ही मनिषा साधीभोळी
शिव-धनुष्य मला कसं पेलावं
जन्म आम्ही थोडाच घेतलाय रामकुळी

नलानेच घालावी दमयंतीस
मागणी, जनरीत असेलही पुराणकाळी
धिर करुन तुच घ्यावा पुढाकार
करावेत असे अपवाद कधीच्या काळी

वाचतेस ना माझी नयन-भाषा
इतकीच कशी ग तू वेडी अन खुळी
होकाराला नाही शब्दांची गरज
फ़क्त घाल ती वरमाला माझ्या गळी

किती काळ तु स्वतःलाच
विनाकारण जाळणार आहेस ग मुली
सरळ हो म्हणून टाक म्हणजे
कसं,मीही मोकळा अन तुही मोकळी

-- भूपेश

माझे तुझ्यावर प्रेम आहे..पण मी खोटे बोलले..

मी म्हंटले,माझे तुझ्यावर प्रेम आहे..
पण मी खोटे बोलले..
कारण मला तुझ्यासाठी जे वाटतय ते..
प्रेमापेक्षाही जास्त आहे..
कसे असु शकते प्रेम...
इतके चांगले की , दोन अनोळखी दोस्त बनले,
इतके निरागस की , प्रेमही दोस्तीत गुंफ़ले गेले,
इतके हवेसे की, सर्व कॉल वाटत असतात तुझे,
इतके मुर्ख की , रोमिंग चाही चालतोय मला खर्च,
इतके प्रेरक की ,सरळ आयुष्यही झाले आहे दिलखेचक,
इतके हळवे की , तुझ्यावरील संकटाने डोळे भरतात माझे,
इतके तेजस्वी की , तु आठवणिंनी ओजंळ भरलीय माझी,
इतके निस्वार्थि की , तुझ्या लग्नाला पाहुणी आहे मी..
कारण मला तुझ्यासाठी जे वाटतय ते..
प्रेमापेक्षाही जास्त आहे..प्रेमापेक्षाही जास्त आहे..

- स्वप्ना

Monday, 28 July 2008

विनोद

बाबा : ताजमहाल कुठे आहे?

बेटा : ठाऊक नाही...

बाबा : अरे, जरा घर सोडून बाहेर फिरत जा. ठीक आहे, मला सांग, लाल किल्ला कुठे आहे?


बाबा : बोंबला, इतकी साधी माहिती नाही तुला. जरा घर सोडून बाहेर फिरत जा. बरं, इतकं तरी सांगू शकशील की जयललिता कोण आहेत?

बाबा : अरेरे, कसं होणार तुमच्या पिढीचं? जरा घर सोडून बाहेर फिरत जा.

बेटा : मला तुम्ही सांगा, तुम्हाला रामलाल कोण आहे?

बाबा : रामलाल... अं... नाही ठाऊक.

बेटा : जरा वेळेवर घरी येत जा!!!!


शिऱ्या - विनोद

सुटीसाठी गावी गेलेला शिऱ्या देवळाशेजारच्या मैदानात क्रिकेटची प्रॅक्टिस करत होता आणि आबा देवळाच्या पडवीतून ती पाहात होते. आपण स्क्वेअर कट कसा एलिगंट मारतो, फ्लिक काय सुरेख करतो, रिव्हर्स स्वीपमध्ये तर कसे मास्टर आहोत, असं अॅक्शन करीत सांगून सांगून त्यानं आबांना जाम पकवलं.

धोतराचा सोगा सावरत खाली उतरून आबा म्हणाले, ''शिऱ्या, तू मला ह्या बॅटिंगच्या गमजा सांगू नकोस. आमच्या काळात सीके नायडू जाम फॉर्मात होता. आम्ही सारे त्याचे भक्त. हे समोरचं आंब्याचं झाड आहे ना! त्याच्या शेंड्यावरून सिक्सर मारायचो आम्ही त्या काळात. ते करून दाखवशील, तर तू खरा बॅट्समन!''

झालं... शिऱ्या पेटला. उंच, डेरेदार आंब्याच्या झाडावरून सिक्सर मारण्यासाठी त्यानं जिवाचा आटापिटा केला. पण, बॉल फांद्यांत आपटून, एखादी कैरी तोडून खाली पडायचा.

तासाभरानंतर दमछाक झालेला, वैतागलेला शिऱ्या गप्पपणे आबांबरोबर घराकडे निघाला, तेव्हा आबा खुसुखुसू हसत म्हणाले, ''अरे शिऱ्या. मघाशी तुला एक सांगायचं राहूनच गेलं. आम्ही जेव्हा लहान होतो ना, तेव्हा ते आंब्याचं झाडही लहानच

होतं... चार फुटांचं!!!!''

विन्या आणि त्याची बायको - विनोद

रस्त्यावरून जाताना सोबत बायको आहे हे विन्या प्रधान विसरला आणि त्याचं लक्ष नेहमीप्रमाणे समोरून येणाऱ्या छैलछबिल्या भाभीकडे गेलंच. बायकोने त्याची नजर ताडली आणि ती त्याच्यावर ओरडली, ''तुझं लग्न झालंय आता विन्या! आता तरी रस्त्यावरच्या बायकांकडे पाहणं सोड.'' '' कमाल झाली,'' विन्या म्हणाला, ''म्हणजे माझं पोट भरलंय म्हणून मी काय मेनू कार्ड सुद्धा पाहायचं नाही का?!!!!!''

Friday, 25 July 2008

गूगलपुराण -भाग 2

आपण गुगलचा उपयोग कॅलक्युलेटर, करन्सी कन्वर्टर आणि युनिट कन्वर्टर म्हणून कसा करायचा ते पाहिलं. आता दुसऱ्या फेरीमध्ये जरा 'हट के' टेकट्रीक्स पाहूयात.

1)सेफसर्च
बऱ्याचदा असं होतं की आपण काही तरी जेन्युइन माहिती शोधायला जातो आणि काहीतरी भलतंच समोर येतं. फॉर एक्झाम्पल, 'ब्रेस्ट कॅन्सर' सर्च दिल्यानंतर 'भयानक'च काहीतरी मिळतं जे चारचौघात बघताच येणार नाही. अश्लील, प्रोहिबिटेट अशा अनेक लिंक काही ठिकाणी सापडतात.घरी आईबाबांसमोर असं काही तरी उघडणं म्हणजे संपलंच.यासाठी 'गुगल'नेच एक ऑप्शन देऊन ठेवलाय. तो म्हणजे सेफसर्चिंग. safesearch:breast cancer असं सर्च दिलं की गुगल तेच शोधून देईल जे तुमच्या अभ्यासाचं आहे.

2)हे किंवा ते
पाहिजे असणारी माहिती काहीवेळा दोन समानाथीर् शब्दांनी शोधता येते. मग आपणच गोंधळतो की नक्की काय सर्च दिला तर परफेक्ट माहिती मिळेल. पण जेव्हा असं कन्फ्युजन होईल, तेव्हा फ्रेण्डलोक नो प्रॉब्लेम... गुगल हैं ना! उदाहरणार्थ, बोटिंग आणि सेलिंग काहीही शोधलं तरी सारखीच माहिती मिळणार आहे. अशा वेळी दोनदोनदा सर्च देण्यापेक्षा साधी आयडिया वापरायची. sailing OR boating असं टाइप करायचं आणि गुगलला सांगायचं की आता शोध रे....

3)नेमकं हेच हवं
एकापेक्षा अधिक शब्दांची माहिती मिळवायची असेल तेव्हासुद्धा गोंधळ होतो. म्हणजे 'मुंबई सेण्ट्रल स्टेशन' असं सर्च दिलं की आपले गुगलमहाराज एवढे हुश्शार की मुंबई, सेण्ट्रल आणि स्टेशन असे शब्द असणाऱ्या सापडतील तेवढ्या लिंक तुमच्या पुढ्यात आणून ठेवतील. हे टाळण्यासाठी एक छोटीशी गोष्ट करायची. Mumbai Central Station असं शोधण्यापेक्षा "Mumbai Central Station" असा सर्च द्यायचा.

4)काय म्हणतंय हवामान?
वेगवेगळ्या ट्रिक्स देताना मध्येच हवामान कुठून आलं असं वाटलं ना... हीच तर गम्मत आहे गुगलची.. इथं कोणताच विषय वर्ज्य नाही... 'काय उकडतयं? वैताग आहे नुसता' असं म्हणायचे दिवस संपताहेत... पावसाच्या हलक्या सरी सांगून गेल्यात की पाऊस उंबरठ्यापर्यंत आलाय... मग आपल्याला हवामानाचा अंदाज घ्यायला हवाच... त्यासाठी आपलं गुगलही सज्ज आहे. weather:(Mumbai) असं सर्च करा आणि घ्या तुमच्या शहराच्या हवामानाचा अंदाज... बघा तर खरं... पाऊस कुठपर्यंत आलाय तो...

Thursday, 24 July 2008

गुगलपुराण- टिप्स & ट्रिक्स

गुगल फक्त सर्च इंजिन नाही, तर तो आहे वेबमित्र. Think what you can't think, google will search for you असं म्हटलंय ते उगीचच नाही. इंग्रजी भाषेत आता 'टू गुगल' हा 'टू सर्च' या क्रियापदाचा पर्याय ठरला आहे. 'आय एम गुगलिंग समथिंग' म्हणजे मी काहीतरी शोधतोय, हे सर्वत्र रुढ झालंय. पण हे गुगलिंग फक्त वेब आणि चित्रांपुरतं मर्यादित नाही. तर हा आहे अनंत अशा सायबर विश्वाचा न संपणारा अखंड शोध... हा शोध अधिकाधिक सोपा व्हावा यासाठी नाना क्लृप्त्या सांगणारं हे 'गुगलपुराण'...


1)कॅल्क्युलेटर

वेळ पडली तर गुगल कॅल्क्युलेटरही होतं. कसं ते पाहायचंय... गुगलवर जा आणि लिहा ७८९२+३९३९ मग एण्टर दाबा. पाहा उत्तर तुमच्या समोर हजर. फक्त बेरीज वजाबाकीच नाही तर टक्केवारी, वर्गमुळापासून साइन, कॉस, टॅनपर्यंत एक कॅल्क्युलेटर जेवढी आकडेमोड करतो ती सारी गुगलवर करता येते.

2)करन्सी कन्वर्टर

एखाद्या वस्तूची किंमत जर ७६५ अमेरिकन डॉलर आहे. तर आपल्या डोक्यात सर्वात आधी येतं ते ७६५ अमेरिकन डॉलर म्हणजे किती रुपये. मग पेपरमधल्या डॉलरचा भाव शोधण्यापासून नेटवरील करन्सी रेटचार्टपर्यंत सारे उपाय अजमावून पाहिले जातात. पण कशासाठी एवढी झंझट??? गुगल है ना! 765 USD IN INR एवढं टाका गुगलमध्ये आणि करा सर्च... पाहा गुगल कसं पटकन उत्तर देईल ते.

3)युनिट कन्वर्टर

ब-याचदा असं होतं की, आपल्याला आपली उंची पाच फूट सात इंच आहे अशी माहिती असते आणि एखाद्या फॉर्मवर सेण्टीमीटरमध्ये उंची लिहायची असते. आता टेप घेऊन भिंतीशेजारी उभं राहावं लागणार किंवा आली पुन्हा आकडेमोड. पण इथेही दोस्त गुगल आहे की राव! 5 feet 7 inch in cm असं गुगलवर टाका, एण्टर करा आणि उत्तर समोर हज्जर... फक्त फूट, इंच, सेण्टीमीटर नव्हे तर अर्धा कप म्हणजे किती टीस्पून हेही गुगल सांगतं... खोटं वाटतं पाहा half a cup in teaspoons टाकून...


Wednesday, 23 July 2008

प्रेम एकदा तरी करायच असत

प्रेम एकदा तरी करायच असत
प्रेमात कस असत....
प्रेमात कस असत....
प्रेमात हे असच असत...

आयुष्याच्या ह्या वाटेवरती
असच जगायाच असत
रडु कितीही आलं तरी
नेहमी हसायच असत...


ह्रुदयाच्या खेळात आपण
कधीच गुंतायच नसत
कारण बाहेर पडण त्यातुन
हे कधीच सोप नसत....

थोडे दिवस थांबायचे,नंतर सोडायचे
हे तीच नेहमीचच असत
कारण आपल्या हळव्या मनापेक्षा
तीच लक्ष पैश्यातच असत...

दिवस रात्र क्षणोक्षणी
आपल मन तीच्यातच असत
मात्र आता समोर आलो तरी
तिच लक्ष आपल्याकडे नसत...

आता ती पहाणार नाही
कारण तिच्यासंगे कुणी दुसर असत
पण फक्त पैसासंपेपर्यंत आहे ती
हे त्या बिचाराल्याही माहीत नसत...

पण आता ती तुमच्याकडे पहातेय
तीच मन तुमच्यावर जडतयं
तुमच्यासाठीच जगते आहे ती
कारण तीला खर प्रेम कळतय...

ह्रुदयातल्याच वेदना खरया
बाकी सारे काही खोटे असतं
आता तीलाही कळले आहे
पैश्याने सारे काही होत नसत...

आता ती फक्त तुमची आहे
बाकी सारे जग जळत असत
आता खरे सूखी आहात तुम्ही
जगाशी तुम्हाला काही घेण नसत...

म्हणुन सांगतो मिंत्रानो
प्रेम एकदा तरी करायच असत
प्रेमासारख्या सुंदर गोष्टीत
पैश्याला काही महत्व नसत...

Chetan Bachhav

Tuesday, 22 July 2008

............तरी माझ्या जवळ आहॆस

तू कूठेही असलीस तरी माझ्या जवळ आहॆस
तू कशीही असलीस तरी आजही माझी आहे

फ़रक एवढाच की मी आज तुझा राहीलॊ नाही
माझ्या स्वप्नांत माझ्या विचारात फ़क्त तूच आहॆस

एक सत्य आहॆ मी तूझ्याशिवाय जगू शकत नाही
एक सत्य आहॆ मी तूला तॆ समजवू शकत नाही

मी जगतॊय आजही एक यूदध जिकंण्यासाठी
पण एक सत्य आहॆ मी तूला हरवू शकत नाही

मी आज गप्प आहे कारण तूच बॊलत नाहीस
मी आजही जागा आहॆ कारणं तू झॊपलीस

मला दुःख नाही आज माझ्या हरण्याचं
कारणं आज मी जरी हरलो पण तू तरी जिकंलीस



Chetan Bachhav

Monday, 21 July 2008

आला पाउस कोवळा- kavita

आला पाउस कोवळा
आला पाउस कोवळा
मन मोरपिस झाले
कश्या बरसल्या सरी
सारे गाव पाणावले
आता येइल साजण
मन होइल मोगरा

माती सुवास उधळी
कसे गाणे आतुरले
आली शहाऱ्याची लाट
कशी मोहोरली वाट
पाऊस खुळा झाला
मन माझे खुळावले
मनी "संतोष" दाटला
नभी दाटला पाउस
बरसल्या "अमॄता"च्या
तन-मन सुखावले

चारोळ्या Charolya

1) सगळे दिवे मालवले तरी
एक दिवा राहून जातो
आणि पहाटे आधी कोणीतरी
तो तेवता दिवा पाहून जातो

2) आभाळभरून येतं तेव्हा कळत नाही
ते कुठून येतं
मला वाटतं कुणाचं तरी ते
कोंडलेलं मन फुटून येतं

3) कधी कधी मला वाटतं
मी अजरामर असेन
झाली आता जगबुडी तर
पुन्हा तुमची वाट बघत बसेन

4) एक पाऊल उचललं की
दुसरं जमिनीवर टेकवावं लागतं
चालणं सुध्दा माणसाला
सुरवातीला शिकावं लागतं

5) वाहून गेलेल्या घरापुढे
राहून गेलेली तुळस आहे
आणि उंच डोंगरावर, देउळाचा
निर्विकार कळस आहे

6) मरायचा अभिनय करता येतो
जगायचा करता येत नाही
मेलेल्याला माणसासारखं
गृहीत धरता येत नाही

7) जसे आपण जगत जातो
तसं आयुष्य सरत जातं आणि
आपण सोडलेल्या, गाळलेल्या जागा
ते नाईलाजानं भरत जातं

8) पहाटे जवळ दोन्ही असतं
काळोख आणि प्रकाश
प्रकाशाला मी मोकळ करते
काळोख गिळत राहते सावकाश

9) दिवस शहाणा असतो
रात्र वेडी असते आणि
पहाटेजवळ वेडेपणाची
रंगलेली गोडी असते

10) सुरुवात कुठून करायची हा प्रश्न
मला सुरुवातीला पडतो
भूतकाळ आठवायचा तर
प्रवास उंबरठयाशी अडतो

11) तुला आठवताना मला
एक भान राखावं लागतं
असं देहाचं उजळणं
काळोखात झाकावं लागतं

12) वा-याची झुळुक रानात
झुलताना दिसली
तू कोण? विचारलं तर
ती अगदी तुझ्यासारखी हसली

13) तू हाक मारलीस तर
मला मागे परतायला जमेल
पण प्रश्न हा आहे की...
तुला हाक मारायला जमेल ?

14) तू म्हणशील तसं
हे माझं ब्रीद वाक्य आहे
आणि लोकांना वाटतं
आपल्या दोघात ऐक्य आहे

Sunday, 20 July 2008

ई-मेल...- EMAIL

मेल..

उजवीकडे तारीख..
मग मायना..
नंतर मजकूर..
बुद्धीबळातल्या उंटासारखा
तिरका वाकडा धावणारा..
तसं बर चाललय आयुष्य
असं पानभर सांगणारा..
खाली डावीकडे लिहिलेलं
कळावे.. लोभ असावा..
तळटीप.. ता.क. उगाच..
काहिसं निरर्थक.. पण
पत्राचा स्कूल पैटर्न पूर्ण करणारं..


आज ती सारी पत्र..
कपाटातून बाहेर सांडली..
आणि.. समजलं
त्या निरर्थक भावनेलाही
किती अर्थ होता..
त्या पत्राला सखे,
तुझ्या हाताचा स्पर्श होता..


आज सातासमुद्रापलिकडून
रोज येतात तुझी फ़ॉर्वर्डेड ई मेल्स
पण.. त्यात.. तू कुठे ग दिसतेस..


ह्याला विज्ञानाचा
शाप म्हणावं की वरदान..
संभ्रमात...

--
सागर सावंत
9960603454
sagar.28june@gmail.com

बघा पटतय का...

१) खिसेकापुच गर्दीत ओरडतो, "खिसापाकीट सम्हालो"
लोक अभावितपणे आपली पाकिंट बघतात आणि
खिसेकापूला लोंकाचा पाकिट ठेवण्याचा खिसा समजतो.

२) स्पर्श न करताही आधार देतो येतो हे ज्याला कळतं त्यालाच
'पालक' शब्द समजला.

३) बेदम पैसा मिळवणं याइअतकं मिडीअऑकर ध्येय दुसरं असूच
शकत नाही. माणसं जोडायला त्यापेक्षा जास्त बळ लागतं.

४) ऑपरेशन होण्यापुर्वी रोगी घाबरलेला असतो. त्यातुन बरा झाला
की शिवलेली जखम तोच कौतुकाने दाखवत सुटतो.

५) 'आपल कुणी अनुकरण किंवा द्वेष करायला लागलं की
समजावं आपला उत्कर्ष होतोय.'

६) सर्वात जीवघेणा क्षण कोणता?
खुप सदभावनेने एखादी शुभ गोष्ट करायला जावं आणि
स्वत:चा काहीही अपराध नसताना पदरी फक्त वाईटपणाच
यावा. सदहेतूचीच शंका घेतली जावी हा!

७) माणूस निराळा वागतोय, बिघडला. असं आपण पटकन
एखाद्याबद्दल बोलतो. पण तसं नसतं. त्या सगळ्याचा अर्थ
तो आपल्याला हवा तसं वागत नाही एवढाच असतो.

८) गैसमज हा कॅन्सरसारखा असतो. तिसऱ्या अवस्थेला
पोहचल्यावर तो आपलं स्वरुप प्रकट करतो.

९) अग्निदिव्य करुनही प्रभु रामचंद्राचे डोळे उघडले नाही
किंवा खात्री पटुनही सीतेच्या नशिबातला वनवास टळला नाही
आणि हे सगळं कुणासाठी? तर लोकांचे कपड्याने डाग
स्वत:च्या उदरनिर्वाहासाठी काढणाऱ्या एका धोब्यासाठी.
कुणाच्या समाधानासाठी कुणाचा अंत पाहायचा हे माणसाने
ठरवले पाहिजे.

१०) जिथं उमटलेला ठसा जतन केला जाईल तिथंच शिक्का
उमटवावा. नाहीतर ते निवडणुकीचे शिक्के होतात.

-- व.पु. काळे

Thursday, 17 July 2008

SMS JOKES

वो आये मेरे सामनेसे
लचकते.... बलखाते... मचलते.....
वो आये मेरे सामनेसे
लचकते... बलखाते.... मचलते.... इतराते......
और आकर दबे होठोंसे बोले......





............भाकर वाढा दादा !!!!!!

SMS JOKES

फोनची बेल वाजते. (तो चुकीचा क्रमांक लागलेला असतो.)

पहिला(फोन करणारा पुणेरी) : हेलौ..

दुसरा : बोला.

पहिला : देशपांडे आहेत का ?

दुसरा(चिडून) : नाही, ते 'पावन खिंडीत' लढतायेत!

पहिला : मग त्यांना सांगा राजे गडावर पोचले. आता मेलात तरी चालेल.

(फोन बंद)

Wednesday, 16 July 2008

हृदय अजून मराठी आहे

विदेशी कपडे घातले तरी
हृदय अजून मराठी आहे
तोडून तुटत नाहीत
या मजबूत रेशीम गाठी आहेत

पिझा, बर्गर खाल्ल्यावरही
पोट पुरणपोळीच मागतं
ईंग्रजी पुस्तकं वाचली तरी
मन मराठी चारोळीच मागतं

मात्रुभूमि सोडली की
आईपासून दूर गेल्यासारखं वाटतं
भाषा सोडली की
अस्तित्व हरवल्यासारखं वाटतं

वडाची झाडं मोठी होऊनही
परत मातृभूमिकडे झुकतात
कितीही दूर गेलं तरी
पाय परत मातृभूमिकडेच वळतात

काहीही बदललं तरी
हृदय अजून मराठी आहे

अरुणोदय

शतकांच्याया यद्न्यातून उठली एक केशरी ज्वाला।

दहा दिशांच्या ह्रुदयामधुनी अरुणोदय झाला।

शिवप्रभुंची नजर फ़िरे उठे मुलुक सारा।

दिशा दिशा भेदित धावल्या खडगांच्या धारा।

हे तुफ़ान स्वातंत्र्याचे। हे उधान अभिमानाचे।

हे वादळ उग्र विजांचे काळोखाचे तट कोसळले चिरा चिरा ढळला।

दहा दिशांच्या ह्रुदयामधुनी अरुणोदय झाला।


स्रोत : धीरज बछाव
dhirajbachhav@gmail.com

Monday, 14 July 2008

माणसं !!!

एकदा कधी चुकतात माणसं,
सारंच श्रेय हुकतात माणसं...

प्रेम करुन का प्रेम कधी मिळतं,
सावकाश हे शिकतात माणसं...

गंधासाठी दररोज कोवळ्या,
कितीक फुलांस विकतात माणसं

शतकानुशतके कुठलीशी आस,
जपून मनात थकतात माणसं...

जुनाट जखमा भरू लागल्या की,
नवीन सिगार फुकतात माणसं...

हरेक पाकळी गळुनिया जाते
अन अखेरीस सुकतात माणसं...

नको रे असं कडू बोलू 'शता'..
उगाचच किती दुखतात माणसं !!!

स्रोत : चेतन बछाव
chetanbachhav@gmail.com

विनोद

1) विमान
विमानात एकजण अचानक उठून उभा राहिला आणि ओरडला, ''हाय जॅक!''

... तत्क्षणी हवाई संुदरीच्या हातातला ट्रे खाली पडला आणि ती थरथरू लागली, पर्सरसह निम्म्याहून अधिक प्रवाशांनी हात वर केले आणि उरलेले भयव्याकुळ होऊन रडू लागले...

... तेवढ्यात समोरून एक प्रवासी उठून उभा राहिला आणि पहिल्या प्रवाशाला पाहून ओरडला, ''हाय टॉम!!!!!''

2) बाप आणि पोरगी
बाबा : पोरी, मोठी झाल्यावर तू काय करणार आहेस?
मुलगी : काही नाही. आई बनेन, शिक्षण घेईन, लग्न करीन. आणखी काय करणार?
बाबा : योजना चांगल्या आहेत तुझ्या बेटा. फक्त जे काही करशील ते योग्य क्रमाने कर, म्हणजे झालं!!!

3) नन्या
नन्या : आई आई, मन्या येतोय. आधी सगळी खेळणी आत ठेवूयात कपाटात.
आई : का रे? मन्या तुझी खेळणी घेऊन जाईल का?
नन्या : नाही गं, तो स्वत:ची खेळणी ओळखेल ना!!!!

Sunday, 13 July 2008

इतिहासाचं चंदन उगाळायला गेलं तर

इतिहासाचं चंदन उगाळायला गेलं तर
आयुष्य खूप सुंदर आहे
बघायला गेलं तर
दु:खातही सुख आहे
जगायला गेलं तर
अश्रूंतही एक समाधान आहे
वाटायला गेलं तर
समाधानातही चिंता आहे
जपायला गेलं तर
काट्यांतही मखमल आहे
सोसायला गेलं तर
फुलां कडूनही जख्म आहे
कुस्करायला गेलं तर
अपयशातही नवी आशा आहे
पचवायला गेलं तर
यश खूपच क्षणिक आहे
उमजायला गेलं तर
मातीतच खरं सोनं आहे
शरीर श्रमाने माखल्यावर
रत्नांची शेवटी मातीच होते
फुलांनी शरीर झाकल्यावर
निखाऱ्यांवर चालावं लागतं
कापसावर उतानी पडल्यावर
वेदनांशी स्पर्धा करावी लागते
हास्य चेहऱ्या मागे दडल्यावर
कल्पना शक्तीचं प्रगती आहे
विज्ञानाचे धडे चाळायला गेलं तर
प्रगतीच विनाशाचं कारण आहे
इतिहासाचं चंदन उगाळायला गेलं तर
"त्यागा" पुढे सारचं शुल्लक आहे
विचारात गीतासार साठवला तर
उदार वृत्ती कधी कधी घातक ठरते
सुर्यपुत्र कर्ण आठवला तर....
खरचं आयुष्य ज्या थोड्यांना कळलं
त्या भाग्यवंतांचं ठीक आहे उरलेल्यांसाठी एकचं प्रश्न....
पण अगणित उत्तरांचं पीक आहे

कवि : चेतन बछाव
chetanbachhav@gmail.com

Thursday, 10 July 2008

प्रेमामधे तर पडलो नाही !

एकदा ती माझ्याकडे आली
माझ्याबरोबर 'चल' म्हणाली,
'हो' म्हणायच्या आतंच ती
देऊन हात, घेऊन गेली
होतो सोबत आम्ही चालत
कधी शांत कधी बोलत,
पायवाट निळसर नव्हती संपत
नभी चांदणे, चंद्रासंगत
गोड गप्पा नव्हत्या थांबत
सुरेल आवाज जणू कोकिळेगत
मौनामधे भासे दिव्य एक रंगत
अनवट सूर, बासरीचे उमलत
हसताना ती बाहुली दिसायची
बारीक डोळे अलगद लाजायची,
गालांवर खळी नाजुक पडायची
नयन शिंपल्यात, जपावी वाटायची
तरूतळी एका आम्ही बसलो
मनीचे सारे तिला मी वदलो,
हात थरथरता तिच्या हातात
परि नजर थेट डोळ्यात
काय झालं पूढे सांगत नाही
स्वप्न सारं पुन्हा आठवायचं नाही,
झालो जागा तरी उठलो नाही
करत विचार पडलो मी,
प्रेमामधे तर पडलो नाही !

सरी ग सरी

सरी ग सरी……
सरी ग सरी……
आल्या ग सरी…..
आल्या ग सरी…..

काळ्या मेघाची तू लेक
आलि वाजत गाजत
ह्या भल्या पावसात
चिंब निघालि भिजुन..

ओलि ओलि तुझी काया
वेगळिच असे माया
फ़ुटे मातीला अंकुर..
स्पर्श तुझाच वेगळा

कोणी दुखात रडते..
कोणी सुखात रडते
तू भिजवून त्यांना..
त्यांच्या आश्रूच झाकते

सुर्य रोजची उगे
किरणे आकाशि पसरे…..
परी..
तुझ्या थेंबांनाच छेदुन
इंद्रधनुष्य ते दिसे

प्रेम दिले तू अपार
तुझे थोर उपकार
माझ्या प्रेमाची ग सखे..!
तू एक ..खरी साक्षिदार…

सरी ग सरी
सरी ग सरी

तू एक ..खरी साक्षिदार..

–स्मिता भरविरकर

Wednesday, 9 July 2008

चारोळ्या

1) हरलेला डाव ऱागाने पुन्हा मांडू नये
खेळण्यांनी खेळण्यांशी हें असें भांडू नये
सोसतांना ती कशी तृप्तीत सोसावी व्यथा
आसवांची बात न्यारी, पण स्व:ता सांडू नये

2) देवाला देवत्व देतो
त्याचे विसर्जनहि करतो
एवढा महान माणूस
कधीकधी आत्महत्याहि करतो

3) मी पाहिलय तुला
मला सोडुन् जाताना....
स्वत:च्या डोल्यातुन
तुला वाह्ताना.....

मराठी लोकांची हिंदी

पहलि बार पोहने गया तो क्या हुआ मालुम?
पहिले पानी मे शिरा, फिर पोहा और बाद मे बुडा!!

घाई करो भैया नही तो बस जायेगी, और हमारी पंचाईत होयेगी!!

सरबत मे लिंबु पिळा क्या!!

इतना महाग कैसे रे तेरे यहा, वो कोपरेका भैया तो स्वस्त देता है!!

कंदा काट के, चिर के मस्त ओम्लेट बनाने का और उपर से थोडा कोथिंबिर भुरभुरानेका!!

अरे बाबा गाडी सावली मे लगा!!

ए भाय, मेदुवडा शेपरेट ला, साम्बार मे बूडा के मत लाना!!

केस एकदम बारीक कापो भैया!!

खाओ पोटभर खाओ लाजो मत!!

मी कोण?

मी एक थेंब.......

जीवनाच्या पावसाबरोबर येणारा.........

आयुष्याच्या पानावर विसावणारा............

काही क्षण विसावून ओघळून जाणारा........

दुसर्‍या थेंबाशी एकरूप होणारा............

कोवळ्या उन्हात मोत्यासारखा चमचमनारा..........

क्षणभराच्या अस्तितवानेही दुसर्‍यांना आनंद देणारा...........


कवि : चेतन बछाव

Tuesday, 8 July 2008

मी एक पाउसवेडा

ताज्या ओल्या मातीवरून
मोतीभरल्या तृणावरुन
हिरव्याकच्च झाडीमधून
मी खुप खुप चालत असतो
मी एक पाउस वेडा
फ़क्त पावसालाच शोधत असतो….

वाट फुटल्या रस्त्यावरून
शांतचित्त खड़कावरुन
वेड लागलेल्या वा-यामागुन
मी धाव धाव धावत असतो
मी एक पाउस वेडा
फ़क्त पावसालाच शोधत असतो….

ऋतुमती धरेसोबत
फडफडणा-या पंखासोबत
ओघळणा-या थेंबासकट
मी थुई थुई नाचत असतो
मी एक पाउस वेडा
फ़क्त पावसालाच शोधत असतो..

कडाडणा-या विजेसारखा
रिमझिमणा-या सरींसाराखा
वाहणा-या पाण्यासारखा
मी पाउसगाणे गात असतो
मी एक पाउस वेडा
फ़क्त पावसालाच शोधत असतो..

माझ्यासारख्या पाउस वेड्या
चातकासारखी वाट पाहतो
मी एक पाउस वेडा
फ़क्त पावसालाच शोधत असतो..
मी एक पाउस वेडा
फ़क्त पावसातच भिजत असतो..


लेखक : पृथा

Monday, 7 July 2008

पूर्तता माझ्या व्यथेची ...

पूर्तता माझ्या व्यथेची माझिया मृत्यूत व्हावी,
जीवनापासून माझ्या ह्या मला मुक्ती मिळावी.

वेदनेला अंत नाही अन्‌ कुणाला खंत नाही

गांजणाऱ्या वासनांची बंधने सारी तुटावी.

संपली माझी प्रतीक्षा, गोठली माझी अपेक्षा

कापलेले पंख माझे .... लोचने आता मिटावी.

सोबती काही जिवाचे मात्र यावे न्यावयाला

तारकांच्या मांडवाखाली चिता माझी जळावी.

दूर रानातील माझी पाहुनी साधी समाधी ....

आसवे साऱ्या फुलांची रोज खाली ओघळावी.

कोण मी आहे ? मला ठाऊक नाही नाव माझे !

शेवटी माझ्या धुळीने चौकशी माझी करावी.

हे रिते अस्तित्व, माझे शोध शून्यातील वेडा

माझियामागेच माझी सर्व ही ओझी रहावी !

काय सांगावे तुला मी ? काय मी बोलू तुझ्याशी ?

राख मी झाल्यावरी गीते तुला माझी स्मरावी !


गीत : सुरेश भट

Sunday, 6 July 2008

तिच्याशी भांडताना ...

तिच्याशी भांडताना नकळत,
मीच नकळत तिच्या बाजूनी होतो!
तिच्या गालचे अश्रू पुसत,
रागच माझा फितूर होत !!

माणुसच आज माणसाला मारायला उठलायं,
हा कोणता नवां धर्म माणसाने स्विकारलाय?
हे माणसा परतून माणसात ये,
सोडून द्वेश, हर्षात ये!

तस पाहिलं तर,
तिची माझी सच्ची मैत्री होती..
आज कित्येक वर्षानी भेटलो,
माझी सारखीच तिही कोणा एकासाठी एकटी होती !!

सोबतीस नाही माझ्या कोणी
तरी जगणं न मी सोडलं...
बदलत राहिले दिवस तरीही,
खापर त्याचे नशिबाच्या माथ्यावरं नाही मी फोडलं !!

शब्द मोत्यांसारखे असतात
म्हणून कसेही माळायचे नसतात....

शब्दांच्या ओळी होतांना,
शब्दांचे अर्थ सांडायचे नसतात!!

लेखक : चेतन बछाव

काय सांगु माझ्या बद्दल ...

काय सांगु माझ्या बद्दल
मलाच काही कळत नाही
पानात पडेल ते खाल्ल्या शिवाय
पोटच आमच भरत नाही.

काय सांगु माझ्या बद्दल
मलाच काही कळत नाही
बोलायच खुप असत मला
पण बोलणं मात्र जमत नाही.

काय सांगु माझ्या बद्दल
मलाच काही कळत नाही
दुखवल जात आम्हाला
दुखवता आम्हाला येत नाही.

काय सांगु माझ्या बद्दल
मलाच काही कळत नाही
खोट खोट हसता हसता
रडता मात्र येत नाही.

काय सांगु माझ्या बद्दल
मलाच काही कळत नाही
दुःखात सुख अस समजता
दुःख ही फिरकत नाही.

काय सांगु माझ्या बद्दल
मलाच काही कळत नाही
बरोबर बरेच असतात
पण एकटेपणा काही सोडत नाही.

काय सांगु माझ्या बद्दल
मलाच काही कळत नाही
चार शब्द सांगतो
पण कोणी ऐकतच नाही.

काय सांगु माझ्या बद्दल
मलाच काही कळत नाही
ज्यांना आम्ही मित्र मानतो
मित्र ते आम्हाला समजतच नाहीत.

काय सांगु माझ्या बद्दल
मलाच काही कळत नाही
मांडायचा प्रयत्न करतोय
पण शब्द ही आम्हाला पुरत नाहीत.

लेखक : चेतन बछाव

Friday, 4 July 2008

आठवणींच्या पावसाने ...

आठवणींच्या पावसाने ,
अंग अंग भिजून गेले…
कांही थेंब सुखावून गेले,
कांही मन हेलावून गेले….

सुखाचे थेंब ओघळून गेले,
गारठ्यातही अंग शहारले…
बाकी थेंब अंगात भिनले,
पावसातही जाळत राहिले….

आठवला तो पहिला पाऊस,
तुझ्या माझ्या भेटीचा…
डोळे पाणावून गेला ,
आज पाऊस आठवणींचा….

कवि : अरविंद

Thursday, 3 July 2008

ती म्हणजे..... - मोबाइल संदेश

पाऊस आणि जमीन यांच किती सुंदर प्रेम,

जमिन झेलायला आतुर पावसाच प्रत्येक थेंब,

माझ्या जिवनात तु पावसासारखं बरसावं,

त्यासाठी मी रात्रंदिवस तरसावं,

तु बरसण्यासाठी आनि मी तरसण्यासाठी,

एकच गोष्ट आवश्यक आहे,

ती म्हणजे.....
तु फ़क्त हो म्हन.

मैत्री - मोबाइल संदेश

गोडीगुलाबी अन् थोडासा रुसवा,

खुप सारे प्रेम अन् थोडासा रागवा...

नको अंतर कधी अन् नको तो ढुरावा,

पावसालाही लाजवेल असा हवा मैत्रीमधे ओलावा...

Wednesday, 2 July 2008

आधार - एक कविता

झाडांना आधार मुळांचा

मुळाना आधार मातीचा

जर मातीच नात तोडु लागली

तर फ़ुलानि कुनासाठि फ़ुलायच ?


छपराला आधार भिंतिंचा

भिंतीला आधार घराचा

घराला आधार मानसांचा

मानसच जर तोंड फ़िरावु लागलि

तर मुलानी कुनासाठि हसायच?


मनाला आधार प्रेमाचा

प्रेमाला आधार तुझ्या विश्वासाचा

पन जर तो विश्वासच डळमळु लागला

तर मनातल्या मायेने कुनसाठि पाझराव?


लेखक : माहीत नाही

कुणाला कुणी असं सोडुन का जातं?

मनाशी मनं आधी जुळवायची कशाला?
जुळलेली मनं पायदळी मग तुडवायची कशाला?
कधि फ़ुलपाखरु होऊन बागडणा-या मनास
काट्यांतच मग खुडावं लागतं.....
कुणाला कुणी असं सोडुन का जातं?


होऊन चांदणं आपल्यावर कुणी बरसुन घेतं
बरसतानाच नकळत हरवुनही जातं
भर चांदरातीही मनास मग
एकट्यालाच झुरावं लागतं...
कुणाला कुणी असं सोडुन का जातं?

कुणास कुणी कधि आपलं म्हणु नये
झालात कुणाचे कधि तर दुर जाउ नये
वाळवंटी या जगात
एकट्यालाच मग जगावं लागतं...
कुणाला कुणी असं सोडुन का जातं?

मी जगुन घेतो एकटा
माझ्याशीच मी हसुन घेतो एकटा
तरी एकट्यालाच रोज रोज मला मरावचं लागतं...
कुणाला कुणी असं सोडुन का जातं?


Tuesday, 1 July 2008

मैत्री - एक कविता

काही माणसे असतात खास
जि मैत्रीने खांद्यावर हात टाकतात,
दुःख आले जिवनात तरीही
कायम साथ देत राहातात.

काही माणसं मात्र
म्रुगजळाप्रमाणे भासतात,
जेवढे जवळ जावे त्यांच्या
तेवढेच लांब पळत जातात.

काही माणसे ही गजबजलेल्या
शहरासारखी असतात,
गरज काही पडली तरच
आपला विचार करतात,
बाकीच्या वेळी ति सारी नाती विसरतात
काही हवे असेल स्वतःला तर तुम्हाला मित्र मित्र करतात.

मात्र काही माणसं ही
पिंपळाच्या पानासारखी असतात,
जाळी झाली त्यांची तरी मनाच्या
पुस्तकात आयुष्यभर जपून ठेवाविशी वाटतात