उजाड़ होते जीवन माझे,
किती परी ते छान होते,
होते माझी मीच एकटी,
सुख किती परी तयात होते,
नाही वाटली ओढ़ कुणाची,
जवळी नव्हते जरी कुणी,
नाही लाभले प्रेम कुणाचे,
नव्हती तयाची खंत मनी,
जीवनात परी तू माझ्या येता,
स्वर्ग सुखाचा झरा वाहिला,
जीवनसाथी मानून तुजला,
गोफ नवा मी त्वरे गुंफला,
धागा परी मध्येच तोडून,
सोडून मजला गेलास तू,
जायचेच जर अखेर होते,
सांग कशाला आलास तू???
--
कवि : गीतांजली
Marathi Kavita : सांग कशाला आलास तू???
२५ ऑगस्ट २००९ Posted By Sunil Jadhav
10:44 AM
|
Label
Marathi kavita,
Prem Kavita,
प्रेम कविता,
मराठी कविता
|
याची सदस्यता घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
नवीनतम पोस्ट
मुख्यपृष्ठ





0 Comments:
तुमचे काय मत आहे?