Thursday, 27 August 2009

Marathi Kavita : जीवन जगन्यात काही औरच मजा आली असती...

जीवन जगन्यात काही औरच मजा आली असती...!!!
अश्रूंचे झाले असते मोती,
काट्यान्ची झाली असती फुले,
खरच जीवन जगन्यात काही औरच मजा आली असती,
जर तू माझ्या हृदयाची राणी झाली असती...

सुरानाही मीळाले असते नवे संगीत,
तीच्या नी माझ्या हृदयाची तार छेडली असती,
खरच जीवन जगन्यात काही औरच मजा आली असती,
जर तू माझ्या स्वरांची रागीणी झाली असती...

डोळ्यांतून हृदयात उतरली असती प्रेमाची नशा,
जगन्यालाही मीळाली असती एक नवी दीशा,
खरच जीवन जगन्यात काही औरच मजा आली असती,
जर तू माझ्या स्वप्नातली परी झाली असती...

प्रेमाची केली असती नवी काव्ये,
आकाशाचा कागद नी सागराची शाई केली असती,
खरच जीवन जगन्यात काही औरच मजा आली असती,
जर तू माझ्या आयुष्याची कादंबरी झाली असती...

नको होते मग काहीही मला आयुष्याकडून,
जर तू माझी झाली असती...
खरच जीवन जगन्यात काही औरच मजा आली असती,
जीवन जगन्यात काही औरच मजा आली असती.....!!!

--
कवि : प्रदिप

Tuesday, 25 August 2009

Marathi kavita : जीवनातली नाती........

जीवनात नाती तशी अनेकच असतात,
पण ती जपणारी लोक फार कमीच असतात......

काही नाती असतात रक्ताची,
तर काही हृदयाची......

काही नाती असतात जन्मो-जन्मीची,
तर काही.. ' काही क्षणापुरतीची '.......

काही नाती असतात,
केसांसारखी न तुटणारी,
पण वेळ आलीच तर वाकणारी.....

काही नाती असतात,
लांबुनच आपले म्हनणारी,
जवळ गेल्यावर मात्र दूर करणारी.....

काही नाती असतात,
पैशाने विकत घेता येणारी,
तर काही प्रेमाने आपलेसे करणारी......

काही नाती असतात,
न जोडता सुद्धा टिकणारी,
तर काही जोडून सुद्धा तुटणारी......

जीवनात नाती तशी अनेकच असतात....

म्हणुनच म्हणतात ना.....

" हे जीवन एक रहस्य आहे,
तिथे सर्व काही लपवावं लागतं....
मनात कितीही दुःख असले,
तरी जगा समोर हसावं लागतं...."

Marathi Kavita : सांग कशाला आलास तू???

उजाड़ होते जीवन माझे,
किती परी ते छान होते,
होते माझी मीच एकटी,
सुख किती परी तयात होते,

नाही वाटली ओढ़ कुणाची,
जवळी नव्हते जरी कुणी,
नाही लाभले प्रेम कुणाचे,
नव्हती तयाची खंत मनी,

जीवनात परी तू माझ्या येता,
स्वर्ग सुखाचा झरा वाहिला,
जीवनसाथी मानून तुजला,
गोफ नवा मी त्वरे गुंफला,

धागा परी मध्येच तोडून,
सोडून मजला गेलास तू,
जायचेच जर अखेर होते,
सांग कशाला आलास तू???

--
कवि : गीतांजली

Sunday, 23 August 2009

Marathi Kavita : तुला जेंव्हा माझी गरज भासेल

तुला जेंव्हा माझी गरज भासेल,
आज जरी तुला माझी गरज नसली,
तरी माझा खांदा तुझ्यासाठी रिकामा असेल,
तुला नवा मित्र मिळाला जरी असेल,
तरी माझा खांदा तुझ्यासाठी रिकामा असेल,

कबूल आहे माझे प्रेम होते तुझ्यावर,
मैत्री असे नाव होते त्याला नेहमी,
तुला जेंव्हा माझी गरज भासेल,
तेंव्हा फक्त मनोमनी हाक मार,
मी धावत फक्त तुझ्यासाठी येइल,
कारण तेंव्हा ही मी तुझाच राहिल,

कदाचित मी नव्हतोच कधी तुझा,
मी होतो फक्त माझाच माझा,
नंतर समजले मी झालो होतो तुझा,
तोवर तू राहिली कुठे होतीस माझी,
नवा पुरता राहिली मैत्रिण माझी,

आज जरी तुला माझी गरज नसली,
तरी माझा खांदा तुझ्यासाठी रिकामा असेल,
तुला नवा मित्र मिळाला जरी असेल,
तरी माझा खांदा तुझ्यासाठी रिकामा असेल,

Saturday, 22 August 2009

Marathi Kavita : ति जेव्हा दिसते तेव्हा...

ति जेव्हा दिसते तेव्हा...मी रोकेल चा रांगेत उभा असतो
बिन बाहीच्या मळक्या बनीयान नेमका माझ्या अंगत असतो
गटारितल्या वळनाची छाप माझ्या तिरप्या भांगामधे असते
तरीही स्टाइल माझा शाहरुख खान वानी धुमशान दिसते

सायंकाली ति दिसते त् माझा हाती दळण असते
मांगे तिची आई अन समोर नाली वरच्या गड्यातले वळण असते
नालीवरती बैलेंस करून मी तिला हात देतो
डोक्यावरचा पीठाचा डब्बा निम्मा अंगावर सांडवुन घेतो
माझा काळा चेहरा मग पीठामुळे पांढरा फकट दिसतो
तिच्याकड़े बघतान्ना आमिर पण मग शाहरुख़ सकट असतो

रात्रीच्या वेळी मग जिम मारतान्ना..... खिडकित ती येउन रोज बसते
ओढ़नी आपली कुरवाळित ...माझा फाटक्या मसल्स वर जणु हसते
तिला पाहून एकT तिर्प्या डोल्यान्न ...मग भारी वजन उच्लाव वाटते
उचलतान्ना वजन मग... सलमान भाऊ माझा शरीरात साठते

तिच्या कड़े कुणी पाहीन इतका कुनात दम नाही
मोहल्ल्यात भाऊ इथं .....आपला बी वट काई कम नाही
बारीक़ जरी असलो तरी आपल्या सारखी कुणाची स्टाइल नसते
पण तिने हाक मारली त्या दिवशी नेमका नाकात शेम्बुड असते

कसं बनवाव ईमप्रेशन मला काई कळत नाही
आपल्या ''फुल जिम बोडी स्लिम'' वर ... ते पोट्टी मरत नाही
बोडी बनवून नुसती काई जर... पोट्टी भाऊ पटली असती
तर ऐशवर्या राय आज प्रिये अमिताभ बच्चन ची सुन नसती


---
कवि : अर्चित 

Friday, 21 August 2009

Marathi Kavita : दप्तर

अडगळीच्या खोलीमधलं
दप्तर आजही जेव्हा दिसतं |
मन पुन्हा तरूण होऊन
बाकांवरती जाऊन बसतं ||

प्रार्थनेचा शब्द अन शब्द
माझ्या कानामध्ये घुमतो |
गोल करून डबा खायला
मग आठवणींचा मेळा जमतो ||

या सगळ्यात लाल खुणांनी
गच्च भरलेली माझी वही |
अपूर्णचा शेरा आणि
बाई तुमची शिल्लक सही ||

रोजच्या अगदी त्याच चुका
आणि हातांवरले व्रण |
वहीत घट्ट मिटून घेतलेत
आयुष्यातले कोवळे क्षण ||

पण या सगळ्या शिदोरीवरंच
बाई आता रोज जगतो |
चुकलोच कधी तर तुमच्यासारखं
स्वतःलाच रागवून बघतो ||

इवल्याश्या या रोपट्याची
तुम्ही इतकी वाढ केली आहे |
हमखास हातचा चुकण्याची सुद्धा
सवय आता गेली आहे ||

चांगलं अक्षर आल्याशिवाय
माझा हात लिहू देत नाही |
एका ओळीत सातवा शब्द
आता ठरवून सुद्धा येत नाही ||

दोन बोटं संस्कारांचा
समास तेवढा सोडतो आहे |
फळ्यावरच्या सुविचारासारखी
रोज माणसं जोडतो आहे ||

योग्य तिथे रेघ मारून
प्रत्येक मर्यादा ठरवलेली |
हळव्या क्षणांची काही पानं
ठळक अक्षरात गिरवलेली ||

तारखेसह पूर्ण आहे वही |
फक्त एकदा पाहून जा |
दहा पैकी दहा मार्क
आणि सही तेवढी देऊन जा ||

Thursday, 20 August 2009

Marathi Kavita : बालगीत

आई-बाबा आवरा
तुमची पालकनीती
आता जरा ऐकून घ्या
आमची बालकनीती.

ताई मला माकडा म्हणते
मांजरी म्हटल तर
तीला आवडेल काय ?
त्याच तोंडान भाऊ म्हटल तर
तीच काही बीघडेल काय ?

जरा कौतुक झाल की
छान तुम्ही डोलता
माझ्या मीत्रांसमोर मला
का हो टोचुन बोलता ?

दरमहा मार्कांसाठी
मला ठेवता ओलीस
खरच सांगा आई-बाबा
पालक आहात की पोलीस ?

Wednesday, 19 August 2009

दवंडी : पळा रे पळा... आकाश पडलं...!!!

माध्यम क्रांती अनेक संधी उपलब्ध करुन देते. निवडीला पर्याय देते. पण उडदामाजी काळे गोरे कसे निवडावे? काय घडतंय यापेक्षा काय काय घडणार आहे आणि त्याला आपण कसे सामोरे जाणार आहोत. त्याचा फायदा आपण कसा करुन घेणार आहोत हे ठरवण्यासाठी ही दवंडी..
एकदा एका राज्यात एक राजा राज्य करीत होता. (प्रत्येक कथेची सुरुवात अशीच करायची असते.) एकदा त्याचे केस कापताना त्याच्या नाभिकाच्या असे लक्षात आले की, राजाला तीन कान आहेत. त्याला हसू आले. राजाने त्याला दटावले. कोणालाही हे सांगितलेस तर मुंडके उडवीन अशी धमकी दिली. त्या नाभिकाची मोठी पंचाईत झाली. आपल्याला एवढे मोठे रहस्य माहीत आहे आणि आपण ते कुणालाच सांगायचे नाही? बायकोलाही नाही? हैराण झाला तो.. दोन दिवस त्याने कळ काढली, पण मग त्याच्या पोटातच दुखू लागले. शेवटी तो एका जंगलात गेला आणि एका हरणाच्या कानात त्याने ही गोष्ट सांगितली.. राजाला तीन कान.. मन मोकळे झाले. पोटदुखी थांबली. तो परत आला. पुढे कुणी तरी त्या हरणाची शिकार केली. त्याच्या चामडय़ापासून कुणी तरी वाद्य केले. वाद्य वाजवणारा राजाचे मन प्रसन्न करण्यासाठी राजवाडय़ात आला. त्याने वाद्य वाजवायला सुरुवात केली आणि त्यातून राजाला तीन कान, राजाला तीन कान असेच बोलू उमटू लागले.
तात्पर्य काय, एखादी गोष्टी कितीही दाबून टाकली तरी ती केव्हा तरी समोर येतेच. कशीही येते, पण आजकाल एवढा काळ थांबायची गरज राहिलेली नाही आणि जंगलात जाऊन हरणाचे कान फुंकायचीही गरज राहिलेली नाहीए. अशी हरणं पावलोपावली भेटतात. आणि त्यांच्या कानात बातम्या सोडणाऱ्या माध्यमांचा तर काय सुकाळूच झालेला आहे.

कुणीतरी म्हटलेलं आहे की, बॅड न्यूज इज अ व्हेरी गुड न्यूज. कुत्रा माणसाला चावला तर ती बातमी होत नाही.. माणूस कुत्र्याला चावला तर होते. त्यामुळे सध्या माध्यमांना सुगीचे दिवस आलेले आहेत. स्वाइन फ्लू या रोगाने त्यांचा बातम्यांचा प्रश्न सोडवून टाकलेला आहे. कुणाला माझं बोलणं क्रूरपणाचं वाटेल, पण जरा नीट शांत डोक्याने विचार करा. सगळे डॉक्टर्स ओरडून सांगत आहेत की, स्वाइन फ्लू हा प्रश्नणघातक रोग नाहीए. जे बळी गेले ते एक तर निष्काळजीपणाचे आहेत किंवा त्यांना एकाच वेळी अनेक आजार झाले होते. ज्याचे निदान झाले तर केवळ सहा दिवसांमध्ये माणूस खडखडीत बरा होतो अशा या रोगाला जणू काही प्लेगची साथ आली आहे असे स्वरूप देण्यास माध्यमे कारणीभूत आहेत.
दिल्लीमें स्वाइन फ्लू का एक रोगी मिला.. स्कूलमें लगा ताला.. अहमदाबादमे स्वाइन फ्लूने किया हमला.. एकने गवाँई जान किंवा पुण्यात हाहा:कार.. जनतेत घबराट.. अशा बातम्या देऊन लोकांच्या मनात कमालीची भीती निर्माण करण्यात येते आहे. होय, आहे. हा आजार आहे. त्याचा प्रसार शिंकांतून, खोकल्यातून होतो. काळजी घेण्याची आवश्यकता आहे हे सगळं खरं असलं तरी साप साप म्हणून भुई धोपटण्यासारखा प्रकार होतो आहे. सरकार पातळीवरून पत्रकबाजी करून त्यात आणखी भर टाकली जाते आहे.

 मेक्सिकोसारख्या देशाने अत्यंत कमी कालावधीत या रोगाचे जवळपास उच्चाटन केले. सोपी गोष्ट. गर्दी टाळा. सगळी पब्लिक फंक्शन्स बंद करा. शाळा-कॉलेज ऑफिसेस काही काळ बंद करा. सहा दिवसांचे या व्हायरसचे आयुष्य आहे. त्यानंतर तो मरेल. त्यांनी हे केले. आपल्याकडे हे होणार नाही. कारण आपल्याला उत्तरं शोधायची नाहीएत. प्रश्नांचा बागुलबुवा करून त्यावर पोळी भाजून घेण्यात आमच्या लोकांना रस आहे. या रोगावर टॅमी फ्लू नावाची एक गोळी आहे. पण ती म्हणे फक्त सरकारी दवाखान्यातच मिळते. का? का नाही सगळीकडे मिळत? रक्त तपासणी करणाऱ्या लॅब इतक्या कमी का? सरकारी इस्पितळाची परिस्थिती पाहिली तर तिथे लोकांनी येऊन कल्ला करावा असं करण्यामागची मनोवृत्ती आणि गर्दीच्या वेळी नाकाबंदी लावून लोकांचे हाल करणे किंवा तेव्हाच रस्त्याची कामे काढणे यामागची सरकारी मनोवृत्ती एकच आहे. लोकांना त्रास झाला पाहिजे. लोकांनी आपल्याकडे दयेची भीक मागितली पाहिजे. नाही तर मग आम्ही नेते कसे? लोकांचे प्रश्न सुटले तर आपल्याकडे कोण येईल? लोक कायम रंजलेले गांजलेले राहिले तरच या तथाकथित नेत्यांना महत्त्व आहे.

जरा आकडेवारी पाहा. पुण्याची लोकसंख्या साधारण पस्तीस लाख. त्यात रुग्ण ११८. मुंबईची लोकसंख्या किती? दीड कोटी. रुग्ण किती ५५. काय गुणोत्तर प्रमाण आहे? नगण्य. पुण्यामध्ये आणि मुंबईत लाखो लोकांना टीबी झाला असेल. जो जास्त धोकादायक आहे. त्याचाही प्रसार थुंकीतून, श्वासातून होतो. त्याच्याबद्दल कोणी काही बोलत नाही. साध्या फ्लूमुळे बळी जाणाऱ्यांची संख्या स्वाइन फ्लूच्या बळीपेक्षा किती तरी पटींनी जास्त आहे. सांगणारे कंठशोष करून सांगतात. पण ऐकतो कोण? माध्यमांची ताकद वाईट गोष्टींसाठी वापरली जाते आहे.

जगात कोणत्याही गोष्टीची विक्री ही केवळ भीती या भावनेनेच करता येते. फिअर फॅक्टर महत्त्वाचा, असं केलं नाही तर तसं होईल. की आपण लागलो धावायला. एका सशाच्या पाठीवर झाडाचं पान पडलं तर तो वळूनही न पाहता आकाश पडलं, आकाश पडलं, म्हणून धावत सुटला. समोर दिसेल त्याला सांगत सुटला.. पळा रे पळा.. आकाश पडलं. तसं आपलं झालंय. अत्यंत शांतपणे संघटितपणे याचा मुकाबला आपल्याला सहज करता येईल असं का नाही वाटत आपल्याला? आणि एवढं आपलं काळीज जर सशाचं असेल तर मग खरोखरीची भयग्रस्त करणारी परिस्थिती आली

-Anand Kulkarni
(anandkulkarni68@gmail.com)

Marathi Kavita : माझ तुझ्यावर प्रेम जडत आहे

माझ तुझ्यावर प्रेम जडत आहे
आठवत त्या मुसळधार पावसामधे
तु चिंब भिजून गेली होतीस
अन ओलेल्या मनाने मला बिलगून
शांतपणे निजून गेली होतीस

खरच सांगतो त्या पाण्यामधे
माझ काळीज बुडत आहे
तुझ माझ्यावर अन
माझ तुझ्यावर प्रेम जडत आहे

वाटत कधी कधी मनातली बात
तुला कशी सांगून टाकावी
अन ह्र्दयाची गाठ
जमलच तर बांधून टाकावी

तूच समजाव माझ्या मनाला
कारण तुला कळतं आहे
तुझ माझ्यावर अन
माझ तुझ्यावर प्रेम जडत आहे

Marathi Kavita : मी शोधतोय तुला अजुन ...

मी शोधतोय तुला अजुन ...
पाण्या च्या तरंगावर,
वार्‍या च्या झुलुकेवर,
फुलांच्या पाकळीवर,
मी शोधतोय तुला अजुन ...

माती च्या गंधात,
वेलींच्या बंधात,
सोनेरी उन्हात,
गवताच्या पानावर,
द वा च्या थेंबात ...

मी शोधतोय तुला अजुन ...

पाण्याच्या काठी,
म उ म उ वाळूत,
मावलत्या सूर्याच्या
बूडणा र्‍या बिंबात,
मी शोधतोय तुला अजुन ...

डोळ्यातल्या पाण्यात,
मीट लेल्या ओ ठ् त,
नाव तुझे घेताच,
जागीच थी जून,
मी शोधतोय तुला अजुन ...

कधीतरी भेटशील ना मला?

मी शोधतोय तुला अजुन ...

Thursday, 13 August 2009

Marathi Kavita : एक सुन्दर चाफेकळी...

म्हणाल तर भोळी, म्हणाल तर खुळी,
स्वत:च्या स्वप्नात रंगणारी, एक सुन्दर चाफेकळी...

ति रुसते, ति हसते, ति बड बड बडबडते,
कधी हळव्या, कधी फुंद, कविता सुन्दर करते..
हसता हसता गाली तिच्या,पड़ते सुन्दर खळी,
स्वत:च्या स्वप्नात रंगणारी, एक सुन्दर चाफेकळी...

ति प्रेमळ, ति सोज्वळ, पण आहे भलतिच हट्टी,
राग, द्वेष, लोभीपणाशी, तिची कायमचिच कट्टी..
सगळ्यान्मधे असुनसुद्धा, सगळ्याहून वेगळी,
स्वत:च्या स्वप्नात रंगणारी, एक सुन्दर चाफेकळी...

निळे डोळे, लाल ओठ, पाठीवर रुळती बटा,
गौर गुलाबी चर्येवर, उष:कालची छटा..
ति अशी, ति तशी, जणु ती सोनसळी,
स्वत:च्या स्वप्नात रंगणारी, एक सुन्दर चाफेकळी...

Wednesday, 12 August 2009

Marathi Kavita : असे हे प्रश्न फक्त मलाच..... की तुम्हाला सुधा पडताता?

जुन्या औल्बम मधले फोटो पाहताना
ते दिवस किती छान वाटतात
आता मोठे जाल्यावर कामाच्या व्यापात
कुठे ती भावंड रोज रोज भेटतात ???

कधीतरी मार्चमधे चीनुच्या Birthaday ला भरलेल्या रोल मधले फोटो अगदी नवम्बर मधे
मीनूच्या Birthaday पर्येंत काढले जायचे............ .....

हल्ली मात्र रोज फोटो काढतो..
पण तरीही बाबानी पुरुवुन पुरुवुन
वापरलेल्या रोल मधले फोटो जास्ती का प्रीय वाटतात ???

त्या वेळी बाबानी माहिन्यातुन एकदा आणलेले बटाटे वडे
आज स्वत:च्या पैशनी रोज खाल्ले तरी बेचव का वाटतात??

पकिटातल्या ५०० रुपयापेशा आईकडून मागुनघेतलेले २० रूपये नेहमी जास्त का वत्ताता ???
बाबाच्या खिशात हलूच सरकवलेले २००० रूपये जेव्हा त्याना अचानक सापडतात..
तेव्हा त्याच्या चेहर्यावर आनद पाहून अश्रु डोळ्यात दाटतात....

१० -१५ वर्षा पूर्वी ज्या बहीणीशी खुप जुन वैर असल्यासारखे भाडायचो...
आज त्याच बहीणीचे धीराचे शब्द इतके का जवलचे वाटतात???
ते जुने दिवस आठवले की, का मनात खोल घर करून जताता...

असे हे प्रश्न फक्त मलाच..... की तुम्हाला सुधा पडताता

Friday, 7 August 2009

Marathi Kavita : बहारो फुल बरसावो...

तुला काय माहित मी तुझ्या साठी काय काय केलंय..
कोणी नाही तेवढ मी तुझ्यासाठी सहन केलंय..

तुझ्या बापानी तर मला कुठचाच नाही सोडला..
त्याने अगदी मला साबणा विनाच धूतलाय..

बघ ना तुझ्या प्रेमात मी किती बदललोय..
साबण विनाच्या धुवण्याने मी किती उजळलोय ..

तुझ्या भावाने तर अगदी कहर केलाय..
जिथे भेटलोय तिथे त्याने मला कूटलाय..

म्हणतात प्यार मे दिल मे दर्द होता है ..
आयला एक जागा नाय जिथे दर्द नही होता है..

बापाने कधी कधी गटाराच्या वा~या घडवून दिल्यात...
आयला उंदीर आणि घुशी पण ओळखीच्या झाल्यात..

नर्स आणि डॉक्टर माझ्या ओळखीचे झालेत...
वार्ड बॉय तेवढे व्हायचे राहिलेत..

खरच ग तरी तुझा नाद नाही मी सोडला..
करीन तर तुलाच हा निश्चय मनाशी पक्का केलाय..

एक दिवस तर कहर झाला..
मला पाहून वार्ड बॉय ओरडला..

अरे खाट तयार ठेवा एक दिवाना आशिक आलाय ...
नेहमीचा कस्टमर आलाय....

बहारो फुल बरसावो..
किसीका का मेहबूब फिर मार खाके आया है..

--

एक वेडा कवी...

Thursday, 6 August 2009

Marathi Kavita : हळवी पाखर

वाटल देखील नव्हत की,
कुणापासून दूर होताना इतक दु:ख होईल.
दु:ख होण्याएव्हढ,
आमच 'हलक' नात खोलवर जाईल.

तिला देखील,
तिला देखील तसच काहीतरी वाटत होत.
हातातून हात सोडताना
पापण्यांखाली पाणी साठत होत.

मग मी स्वतःलाच समजावलं की,
आयुष्य असच चालत राहणार.
आठवणींच्या पाऊल खुणा ठेऊन,
'ही' हळवी पाखर दूर उडून जाणार....

Monday, 3 August 2009

Marathi Kvita : ख़रच ... हिला वेड लागलय ...

दूर कुठे तरी हरावाल्यासारखी बघते,
हळूच गालातल्या गालात हसते,
नकलतच स्वता:तच गुंतते,
अन त्याचाच विचार करत क्षितिजापार पाहते,
ख़रच ...... हिला वेड लागलय ....

तो नसतानाही त्याच्याबरोबर बोलते,
अन तो समोर नसतानाही त्यालाच ही पाहते,
कुनाशिही बोलताना ह्याचाच विषय असतो,
रात्रंदिन हिच्या स्वप्नात तोच एक राहतो,
ख़रच ...... हिला वेड लागलय ....

ती स्वतःचा नाही त्याचाच विचार करते,
देवाकडे स्वतःच नाही त्याच सुख मागते,
तो समोर असला की त्याच्याशी बोलताच नाही,
सांगा बर, ही न बोलान्याच सोंग घेते की नाही?
ख़रच ...... हिला वेड लागलय ....

आवडतो का तो विचारल्यावर लाडिक हसते,
माहित नाही म्हणुन विषय बदल म्हणते,
गालावरची लाजेची रक्तिमा लपवशील कशी?
त्याच्यावरती प्रेम आहे हे त्याला सांगशील कधी?
ख़रच ...... हिला वेड लागलय ....

Marathi Kavita : तुझ्या सुख दुखात मला साथीदार व्हायचय

तुझ्या सुख दुखात मला साथीदार व्हायचय,
तुझ्या प्रत्येक क्षणाच मला साक्षीदार व्हायचय,

तुझ्या निर्मळ अन्तहकरणात मला खोल खोल शिरायचय,
तुझ्या प्रेमळ सहवासात मला सतत दर्वलायचय,

पहिल्या पावसात तुझ्या सोबत चिम्ब चिम्ब भिजायचय,
ओल्या हिरवलिवर तुझ्या सोबत मनमुराद बागडायचय,

तुझ्या कुशितुन मला गुलमोहर फुलताना पहायचाय,
गुलमोहरा सारख फुलत तुझ्या कुशीत जगायचय,

तुझ्या आधाराने मला क्षितिज माझ गाठायचय,
तुझ्याच आधाराने मला आपल घरट बांधायचय,

तुझ्या मिठीत शांत निजुन तुझ प्रेम मला अनुभवायचय,
तुझ्याच मिठीत शांत निजुन हे जग सोडून जायचय....