- निर्णय चुकीचा आहे का योग्य आहे हे काळावर मोजायचं की बुद्धीवर? तुम्हाला बुद्धीच नसेल तर पेपर सोडवायला संपूर्ण तीन तास नव्हे तर अख्खा दिवस दिला तरी काय उपयोग ? आपण सगळ्या गोष्टी वापरायला शिकतो. फ़क्त वेळ वापरायला शिकत नाही.
- आयडेंटिटी कार्डासारखी विनोदी गोष्ट साऱ्या जगात नसेल. आपण आहोत कसे? हे खरं त्यांना हवं असतं. त्याऎवजी आपण दिसतो कसे ते पाहून ते आपल्याला ओळखतात.
- रातराणीचा सुगंध पलंगावर लोळता लोळता उपभोगू शकतो. पण तुळस वॄंदावनातच रहाते. तिच्यापुढे आपल्याला उभंच रहावं लागतं.
No comments:
Post a Comment