आयुष्याच्या वाटेवर,
मी आता मागे वळून पहात नाही
कारण मागे वळून पहाण्यासारखे,
खरंच काही उरले नाही......
वळणावर!!!!!!!!!
या वळणावर निघुन गेलीस,
म्हणून मी थांबणार नाही
कारण मला माहीत आहे की,
पुढच्या वळणावर तु भेटल्याशिवाय राहणार नाही.......
चाललो मी......
वाट बघुन त्रासलो आहे ,
डोळ्यात प्राण आणून थकलो मी
येणार आहेस का नक्की सांग,
नाहीतर हा चाललो मी......
मनातले भाव ......
मनातले भाव ओठांवर नाही आले,
म्हणून लेखणीवाटे कवितेत उतरवले
पण सर्व व्यर्थ गेले,
कारण त्यातले भाव तुला कधी ना उमगले....
एकदातरी तुला अडवणार आहे...
जायची म्हणून जाऊ द्यायचे का?
निघाली म्हणून निरोप द्यायचा का?
माझंही काही कर्तव्य आहे
ते मी करणार आहे
जायच्या आधी एकदातरी तुला अडवणार आहे...
आतापर्यंत ......
आतापर्यंत हेच म्हणालो की
आता झालं - गेलं जाउ देत..
पण आता मी तसं म्हणणार नाही
कारण त्याने आता काहीच साध्य होणार नाही....
मी तयार आहे......
प्रयत्न करायला मी तयार आहे
मैदानात उतरायलाही तयार आहे
पण हार आधीच निश्चित असेल
तर मैदानात उतरायची तरी काय गरज आहे????
मजा....
कुणितरी ऐकतयं म्हणुन
Thursday 16 October 2008
Marathi Kavita : आयुष्याच्या वाटेवर...
Subscribe to:
Post Comments (Atom)
uttam kavita aahe he mazyzch manatle samor mala disle
ReplyDelete