आज शांत एकांती
येति आज शांत एकांती
येति तिच्या आठवणी
आठवते सारे...सारे
गुणगुणले होते कुणी...
गुणगुणले होते कुणी----
मुग्ध कळी उमलली
उमलली तुझ्याचसाठी;
तुझ्याचसाठी वेडी कुणी!
तुझ्याचसाठी वेडी कुणी,
तुझ्या कळते नकळत;
कळते न तुला वेड्या,
गाते ती रे प्रेमगाणी!
प्रेमगाणी विरली अन्
अन् आर्त सूर आता
उरलेले रेंगाळती---
आज शांत एकांती...
आठवते सारे...सारे
गुणगुणले होते कुणी...
गुणगुणले होते कुणी---
मुग्ध कळी उमलली
उमलली तुझ्याचसाठी;
तुझ्याचसाठी वेडी कुणी!
तुझ्याचसाठी वेडी कुणी,
तुझ्या कळते नकळत;
कळते न तुला वेड्या,
गाते ती रे प्रेमगाणी!
प्रेमगाणी विरली अन्
अन् आर्त सूर आता
उरलेले रेंगाळती---
आज शांत एकांती...
Marathi Kavita : तिच्या आठवणी
२५ डिसेंबर २००९ Posted By Sunil Jadhav
९-४२ am | Label Marathi kavita, Prem Kavita, प्रेम कविता, मराठी कविता | 0 Comments
Marathi Kavita : फुटलेल्या चष्म्यातून....
८ डिसेंबर २००९ Posted By Sunil Jadhav
फुटलेल्या चष्म्यातून....
माझं ना आभाळाशी एक नातं आहे...
मैत्रीच म्हणा नं...
अगदी लहानपणापासून...
एक टक आभाळाकडे बघत बसायचो...
ती सारी निळसर छटा मनात उतरायची...
मनभर पसरायची...
हजार प्रश्न पडायचे..
वाटायचं त्याच्या कडे नक्की उत्तरं असतील...
काही उत्तरं मिळाली..
काही मिळतील...
आताशा माझी नजर पृथ्वी कडे वळू लागलीये..
जगण्याची भाषा मला आताशा कळू लागलीये..
बघतो सारे..
फसवी गणिते..
त्यांची फसवी उत्तरे..
लटक्या जगण्याच्या
लटक्या खेळ्या...
लटके डावपेच..
भेसूर चेहेरे..
परत आभाळाकडे पाहू लागलोय..
पण आभाळही ठिकर्या होऊन परत जोडल्या सारखं दिसतंय...
फुटलेल्या चष्म्यातून पाहिल्यासारखं..
ओरखडा उठलेल्या मनातून पाहिल्यासारखं...
--
हर्षद कुलकर्णी
४-४१ pm | Label Marathi kavita, मराठी कविता | 4 Comments
Marathi Kavita : काही नाहि हो...रोजचच आहे, हिला जरा चढली...
७ डिसेंबर २००९ Posted By Sunil Jadhav
आयुष्याची सुरवातीची पाने थोडीशी मळली...
आणि थोडीशि पाने तर पुस्तकातूनच गळली ...
दोन-चार पाने निशिबाने बेदर्दपणे चूरगळली.....
उरलेली काही पाने मी "चखणा" म्हणुन गीळली.....
असं काही बोलायला लागले की...............
लोक म्हणतात "काही नाहि हो...रोजचच आहे, हिला जरा चढली"
अहो पण खरंच सांगते मला नाहि चढत,
न पिता सुद्धा मी अशीच असते बडबडत
हां..... आता पिल्यावर थोडी-फार झुलते मी....
अन् झुरके मारले दोन-तिन की एकदम खुलते मी....
मी पिले तरी लोक बोलतात.....
नाहि पिले तरी लोक बोलतात....
लोकांच तर कामच असतं बोलणं
म्हणुन काय मी लोकांखातर सोडून देऊ पिणं?
अहो किती कठिण होउन बसेल मग माझ्या सारखीचं जीणं................
---
प्रिया गवई
४-४१ pm | Label Marathi kavita, मराठी कविता | 0 Comments






