Friday 30 January 2009

Marathi kavita : तू...

सर्व काही आठवणी आता कश्या मागच्या मार्गावर राहिल्यात..

पण तू अजुनही मनावर राज्य करतेस..


सारे काही विसरन्याच्या मार्गावर असताना 


अजुनही तू एक हसू ओठांवर सोडतेस..

अजुनही वेडसरपना गेलाय नाही ..


शहानपण अंगि आले असुनही कुठेतरी 


ह्रदयाच्या कोपर्‍यात तू तशीच आहे जशी होतीस ..

आधी कसे तू मी सोबत असताना वातावरण मंतारून जायचे ..


मिठीत असताना तू सारे मंद होउन जायचे ..


आजही खास असे काही बदलले नाही .. 


बदलली ती मने फक्त .. बदलल्यात त्या वाटा फक्त ..

पण इतकाच हा बदलाव काफी असतो माणसांना माणसांशी तोडण्यासाठी...

आज उरलीत तितकीच श्वासे जितकी तू देऊन गेलीस ..


कदाचित आठवले तर आठव तुला दिलेले मी एक वचन ..


बस तितकेच माझ्या सोबत आहे ..


सारे काही कदाचित फार दूर राहून जाईल ..


आठवनिंना विसर आणि विसरतांना आठवणी येणारच ..


चुकलेल्या या प्रेमाच्या वळनाला एखाद्या जन्माला वळ्न मिळाणाराच ..


तू ज़ख्मा जरी दिल्यास तरी त्यावरही प्रेम असणारच ..


तुझ्या माझ्या झालेल्या चुकांना कुठेतरी माफ़ी होणारच ..


तू दूर कुठेही रहा पण अपी चेतन मधे आणि 


माझ्या कवितांना मधे तुझा सहवास कायम राहणारच ...

No comments:

Post a Comment