Tuesday 7 July 2009

Marathi Kavita : हारलो प्रत्येक वेळी

हारलो प्रत्येक वेळी , डाव तरी ना मोडला
बोल , मी नशिबास माझ्या बोल केव्हा लावला ?

एकदा कधी चुकीने , भाग्य आले भेटण्या
बावरोनी मीच माझा चेहरा हा झाकला !

सोडुनी घर आपुले , ना कधी आलीस तु
रडुनी अनिकेत मी , संसार माझा मांडला !

यातनांची दीर्घ यात्रा , चालता थकलो जरी
ना तुझ्या दारात केव्हा मी विसावा याचिला !

हार माझी हार होती , मानिले मी लाखदा
मी तसा नव्हतो हुतात्मा , हारता जो जिंकला !

श्रीकांत चेंडके

2 comments:

  1. hello ,

    chan blog ahe.
    nice collection of marathi kavita!

    very good read.

    thanks

    ReplyDelete
  2. धन्यवाद अर्चना,

    तुमच्या प्रतिक्रियेमुळेच पुढे काम चालु ठेवण्याची प्रेरणा मिळते.

    ReplyDelete