Tuesday 20 January 2009

Marathi Kavita : पलायन

वेगाने निघून जाताना निदान वळुन तरी बघायचे होते
वस्ती जळत होती आणि आमचे हात वर होते
सर्प झाडावर चढला की पक्षी, पिले सोडून उडून जातात
पण, आज ना उद्या हे सगळे बदलणार होते
गावात आक्रोशाचा भडका उडणारच होता
माणसांनी असे ऐनवेळी पलायन करू नये
वस्ती जळू लागली की, पळुन जाऊ नये


कवी :- लोकनाथ यशवंत 

1 comment: