Thursday 6 August 2009

Marathi Kavita : हळवी पाखर

वाटल देखील नव्हत की,
कुणापासून दूर होताना इतक दु:ख होईल.
दु:ख होण्याएव्हढ,
आमच 'हलक' नात खोलवर जाईल.

तिला देखील,
तिला देखील तसच काहीतरी वाटत होत.
हातातून हात सोडताना
पापण्यांखाली पाणी साठत होत.

मग मी स्वतःलाच समजावलं की,
आयुष्य असच चालत राहणार.
आठवणींच्या पाऊल खुणा ठेऊन,
'ही' हळवी पाखर दूर उडून जाणार....

2 comments:

  1. होतं खरं असं कधी कधी.

    ReplyDelete
  2. होय, बरोबर आहे तुमचे...

    ReplyDelete