Monday 5 July 2010

Marathi Kavita : पावसा , कालपासून भलताच पेटलायस...

बघ ना थोड .......
पावसा , कालपासून भलताच पेटलायस !
पावसा , कालपासून भलताच पेटलायस !
पावसा .!!!!!.....
ये म्हटल्याने येत नाहीस ...
जा म्हटल्याने जात नाहीस ...

बघ ना थोड त्या काळ्या आई कडे
दमली री बिचारी ती.... तुझी वाट पाहून
ते सकाळी गोड असलेलं सोनेरी किरणं...
ते सकाळी गोड असलेलं सोनेरी किरणं...
दररोज दुपारी असुरांचा राजा बनतो रे
काळीज तोडला रे बिचारीच..........

बघ ना थोड त्या काळ्या आई कडे...
किती सुंदर होती रे ती धरणी माता..फुलांनी फुललेल्या बागेत...झाडांन सोबत गाणं गाणारी..
अन वाऱ्याची साथ असायची संगीताची...
किती शांत सावली....हिरवीगार....त्या झाडांची
किती चिव चीवाट होता त्या पाखरांचा..
किती सुखी होती रे तिची पोर....
जेव्हा तू सतत बरसायचास...अन त्या असुरांच्या राजा ला पुन्हा सोनेरी किरण बनवायचास..

पण तू आता पुन्हा पेटलायस......
पुन्हा त्या पोरांच्या आश्या जाग्या केलायस
पुन्हा ते वार वाहायला लागलय.....
पुन्हा ती वाट पाहतायत नदी नाले....दऱ्या मधून वाट शोधायला..
पुन्हा ती आपली आई सुंदर बनायचा विचार करतीय...झाडांन सोबत गाणं गायला..
त्या सोनेरी किरणांचा मनमुक्त आनंद लुठायला........

कवि : रवी

No comments:

Post a Comment