Wednesday 22 December 2010

Marathi Kavita : जेव्हां मिळेल एकांत...

कधी मिळाला एकांत
तर् बसावे....एकटेच्
काढीत जून्या आठवणी
काही क्षणांच्या....हलकेच्

ते क्षण रंगवावे,
सजवावे डोळ्यांच्या पापण्यांवर
जे,...
कधी दुस-यात रमलेले,
कधी आपल्यातच् हरवलेले,
कुणावर रागावलेले..

तर कधी....
आपल्यावर् कुणी हिरुमुसलेले
अन् त्याचा रुसवा काढण्यासाठी
आपणही खोटे-खोटेच् रुसलेले

ते क्षण लांबवावे...
डोळ्यांच्या कोंदणात त्यांना
मंद हासवावे....
अशा क्षणांच्या स्मॄतीत,
डोळे भरुन येतात्
त्यातील काही आसवे
गालावरती ओघळतात

अशावेळी....
त्यातल्या काही आसवांना
हातावर झेलावे, पहावे
फक्त पहातच रहावे
आणि....

एका वेगळ्या आशेसाठी
त्यांस चवीने चाखावे
ते फक्त....

गडद स्मॄतींना पचविण्यासाठी
आणि त्या पून्हा जाग्या करण्यासाठी
जेव्हां मिळेल एकांत...........
 


Kusumagraja, Siravadakara: Eka sodha 
 Muktayana

No comments:

Post a Comment