Monday 8 March 2010

Marathi Kavita : निसर्ग २

वळीवाचा पाऊस आला
अन शांत निजलेली जागली पाखरं

सरींच्या असंख्य आरश्याचा
सडा पडला जमिनीवर

सुर्यबिंब ही मानुन हार,
मंदावले आहे
नी लपले आहे ढगाआड

न सांगता आलेल्या पाहुण्यासारखे
मी ही केले नाही त्याचे स्वागत
नुसताच वळलोय दुस-या कुशीवर

कुठेतरी वर्षोनवर्षे तप करणा-या
चातकाला मात्र झालाय अगणित आनंद

आम्ही फ़ुके त्रस्त
झालो असलो तरी

एकटा तोच तृप्त आहे

- राज

No comments:

Post a Comment