परवा भेटला बाप्पा, जरा वैतागलेला वाटला
दोन क्षण दम खातो म्हणून माझ्याघरी टेकला
उंदीर कुठे पार्क करू ? लॉट नाही सापडला
मी म्हंटलं सोडून दे, आराम करु दे त्याला
तू पण ना देवा कुठल्या जगात राहतोस ?
मर्सिडिस च्या जमान्यात उंदरावरून फ़िरतोस
मर्सिडिस नाही निदान नॅनो तरी घेऊन टाक
तमाम देव मंडळींमधे भाव खाऊन टाक
इतक्या मागण्या पुरवताना जीव माझा जातो
भक्तांना खुश करेपर्यंत माझा जीव दमतो
काय करू आता सार मॅनेज होत नाही
पुर्वीसारखी थोडक्यात माणसं खुशही होत नाहीत
इमिग्रेशन च्या रिक्वस्ट्स ने सिस्टीम झालीये हॅंग
तरीदेखील संपतच नाही भक्तांची रांग
चार आठ आणे मोदक देऊन काय काय मागतात
माझ्याकडच्या फ़ाइल्स नुसत्या वाढतच जातात
माझं ऐक तू कर थोडं थोडं डेलिगेशन
मॅनेजमेंटच्या थेअरीमधे मिळेल सोल्यूशन
एम बी ए चे फ़ंडे तू शिकला नाहीस का रे ?
डेलिगेशन ऑफ़ ऍथॉरिटी ऐकल नाहीस कारे ?
असं कर बाप्पा एक लॅपटॉप घेउन टाक
तुझ्या साऱ्या दूतांना कनेक्टीव्हिटी देऊन टाक
म्हणजे बसल्याजागी काम होइल धावपळ नको
परत येउन मला दमलो म्हणायला नको
माझ्या साऱ्या युक्त्यांनी बाप्प झाला खुश
माग म्हणाला हवं ते एक वर देतो बक्षिस
सी ई ओ ची पोझिशन, टाऊनहाऊस ची ओनरशिप
ईमिग्रेशनदेखील होइल लवकर मग ड्युअल सिटिझनशिप
मी हसलो उगाच, म्हंटल, देशील जे मला हवं ?
म्हणाला मागून तर बघ, बोल तुला काय हवं !
पारिजातकाच्या सड्यात हरवलेलं अंगण हवं
सोडून जाता येणार नाही अस एक बंधन हवं
हवा आहे परत माणसातला हरवलेला भाव
प्रत्येकाच्या मनाच्या कोपऱ्यात थोडासा शिरकाव
देशील आणून परत माझी हरवलेली नाती
नेशील मला परत जिथे आहे माझी माती
इंग्रजाळलेल्या पोरांना थोडं संस्कृतीचं लेणं
आईबापाचं कधीही न फ़िटणारं देणं
कर्कश्श वाटला तरी हवा आहे ढोलताशांचा गजर
भांडणारा असला तरी चालेल पण हवा आहे शेजार
य़ंत्रवत होत चाललेल्या मानवाला थोडं आयुष्याचं भान
देशील का रे बाप्पा माझ्या पदरात एवढं दान ?
"तथास्तु" म्हणाला नाही सोंडेमागून नुसता हसला
सारं हाताबाहेर गेलंय पोरा "सुखी रहा" म्हणाला बाप्पा माझा.
Friday, 29 August 2008
Marathi Kavita : गणपती बाप्पा ( Shree Ganesh )
Marathi Kavita : तू माझी ???
मी तुझ्याबरोबर खेळतो
तेच मुळी हरण्यासाठी
तुझ्या गालावरल्या खळीत
हसु भरण्यासाठी!
प्रेम होतं किंवा केलं जातं
यावर पुर्वी पासुन वाद आहे
पण एक मात्र नक्की,
जो प्रेमात पडला...
तो वैयक्तिक जीवनात बाद आहे!
प्रेम विवाहाच्या मी अगदी विरुध्द आहे,
कारण गुणांपर्यत ठीक आहे,
दोष कळले की ते एक न संपणरं युध्द आहे!
तु कौलेजला आलीस की
माझी नजर तुझ्यावर खिळते
त्यातुनच पुढचं आयुष्य जगायची
स्फुर्ती मला मिळते!
तु इतकी सुंदर आहेस की
कुणाचही तुझ्यावर प्रेम बसेल
खुप भाग्यवान ठरेल तो
ज्याच्यावर तुझं प्रेम बसेल!
प्रेमे मिळणं ही सुध्दा
एक कला आहे,
पण मी प्रेम मिळवु शकलो नाही
याचं दु:ख मला आहे!
शाळेत मुलीच्या बाजुला बसणं
ही आमच्यावेळी शिक्षा होती
आज कुणीतरी बाजुला बसावं
ही माझी छोटीसी अपेक्षा होती!
चारोळ्या लिहिताना डोळ्यासमोर
नेहली फक्त तु असतेस,
तेंव्हा तर डोळे उघडे असतात,
पण हल्ली डोळे मिटल्यावरही दिसतेस!
कौलेजच्या कट्ट्यावर मुलींना छेडणं
हा जणु काही आमचा खेळ होता
परीक्षेच्या दिवसातही ह्या गोष्टींसाठी
प्रेत्येकाकडे बराच वेळ होता!
प्रेमभंग म्हणजे
मुका मार आहे,
जखमा दिसत नसल्यातरी
वेदना फार आहे!
-
Sagar Sawant
Wednesday, 27 August 2008
Marathi Kavita : कुणाच्याही इतके जवळ जाउ नये
कुणाच्याही इतके जवळ जाउ नये,
की आपल्याला त्याची सवय व्हावी
तडकलेच जर हृदय कधी
जोडताना असह्या यातना व्हावी
डायारीत कुणाचे नाव इतकेही येऊ नये
की पानाना ते नाव जड व्हावे
एक दिवसा अचानक त्या नावाचे डायारीत येणे बंद व्हावे
स्वप्नात कुणाला असंही बघू नये
की आधरला त्याचे हात असावे
तुटलेच जर स्वप्न अचानक
हातात आपल्या काहीच नसावे
कुणाला इतकाही वेळ देऊ नये
की आपल्या क्षणाक्षणवर त्याचा अधिकार व्हावा
एक दिवस आरशासमोर आपणास
आपलाच चेहरा परका व्हावा
कुणाची इतकिही ओढ नसावी
की पदोपदी आपण त्याचीच वाट बघावी त्याची वाट बघता बघता
आपलीच वाट दिषहीन व्हावी
कुणाचे इतकेही एकू नये
की कानात त्याच्याच शब्दांचा घुमजाव व्हावा
आपल्या ओठातुन मग
त्याचाच शब्दांचा उच्चार व्हावा
कुणाची अशीही सोबत असु नये
की प्रतेक स्पंदणात ती जानवावी
ती साथ गमावण्याच्या केवळ भीतीने
डोळ्यात खळ्खळ अश्रू जमवी
कुणाला इतकाही माझा म्हणू नये
की त्याचे "मी पण " आपण विसरून जावे
त्या सभ्रमातुन त्याने आपल्याला
ठेच देउन जागे करावे
पण, पण
कुणाच्या इतक्यही दूर जौ नये
की आपल्या सावालीशिवाय सोबत
काहीच नसावे
दूर दूर आवाज दिला तरी आपले शब्द जागीच घुमवे
Tuesday, 26 August 2008
40 Marathi Charolya : 40 मराठी चारोळ्या
नमस्कार, मराठी चारोळ्याच्या शरुंखलेत भर टाकत 40 चारोळ्या मी आज तुमच्या समोर देत आहे बघा तुम्हाला आवडतात का ह्या चारोळ्या. यात सुधारणा व शब्द बदल असतील तर कळावे...
1. घरात काळोख शिरेल म्हणुन
2. सुंदर लाटेवर भाळून
3. चंद्राबरोबर चांदनी एकच असते
4. गावातले सगळे रस्ते
5. रात्रीची जागी राहून
6. नाही म्हणाले नसले तरी
7. तू सोडून जाशील म्हणुन
8. काय सांगू तुला
9. मन किती वेडं असतं
10. तुझ्या शिवाय जगण्याचा
11. सगळ्यान मध्ये तू असलास तरी
12. शहाणं बनण्यापेक्षा मला
13. जगणं असह्य झाल्यावर
14. डोळ्यातून अश्रु ओघळला
15. तुझ्या विषयी बोलताना
16. तू मला फसवणार होतास कधीतरी
17. घरात काळोख शिरेल म्हणुन
18. तुझ्या आठवणी आठवण्याचा
19. तुझ्या पासून दूर जाताना
20. मला हव्या असणा-या व्यक्तिंपैकी
21. प्रेम करायचाच म्हटल तर
22. कदाचित म्हणताना माणूस
23. ओळखिच्या माणसाने
24. दिवेलागण वणव्यासारखी पसरते
25. रात्रं पटकन सरते
26. आभाळ बरसताना
27. पाऊस म्हणजे खरं सांगतो
28. कुठून तरी येउन
29. वेड्या क्षणी भास् होतो
30. पाऊस एकदाचा पडून जातो
31. पावसावरच्या निबंधाला
32. श्रवण म्हणजे मला वाटतं
33. शब्द हा शेवटचा उपाय आहे
34. मनाची तहान
35. मला एक सुखी माणूस
36. त्याच्याकडे काय मागायचं
37. पुढे अथांग पसरलेला सागर
38. पहाटेआधी जाग येणं
39. एक निरंतर प्रवास सुरु होतो
40. तू क्षितिजासारखा......
(विनंती: आधीच्या आणि आज दिलेल्या चारोळ्या मिळून काही चारोळ्या काही दोनदा आल्या असतील तर त्याबद्दल मला क्षमा करा)
1. घरात काळोख शिरेल म्हणुन
घरात काळोख शिरेल म्हणुन
मी सगळी दारं लावून बसलो
आणि स्वत:च्या खुळेपनावर
अंधारात बसून हसलो
2. सुंदर लाटेवर भाळून
सुंदर लाटेवर भाळून
सूर्य तिच्याकडे आकर्षला
दिवसाची खुप आश्वासन
देऊन रात्री मात्र फितूर झाला
3. चंद्राबरोबर चांदनी एकच असते
चंद्राबरोबर चांदनी एकच असते
पण तीचं नक्की सांगता येत नाही
त्याला रोज बदलताही येइल पण
तीला ते जमणार नाही
4. गावातले सगळे रस्ते
गावातले सगळे रस्ते
रात्री गावाबाहेर पडतात
मला घरीच परतायचं असतं
पण ते मला रानात नेउन सोडतात
5. रात्रीची जागी राहून
रात्रीची जागी राहून
मी त्या चांदनिला बघत होती
ती सुद्धा माझ्याप्रमाणे
एकटीच हसत होती........
6. नाही म्हणाले नसले तरी
नाही म्हणाले नसले तरी
हो सुद्धा बोलले नाहीतो
विचारून थांबला तरी
मला काही सुचले नाही ....
7. तू सोडून जाशील म्हणुन
तू सोडून जाशील म्हणुन
मी वेडी झाली होती
आणि मी वेडी झाली म्हणुन
तू सोडून गेलास .......
8. काय सांगू तुला
काय सांगू तुला
जग माझ्यावर हसतं
तुझ्यासाठी वेडी झाली
असं उगाच बोलतं.......
9. मन किती वेडं असतं
मन किती वेडं असतं
नको तिथे धावतं
आपल्याला काय हवं आहे
हे त्याला बरोबर कळतं
10. तुझ्या शिवाय जगण्याचा
तुझ्या शिवाय जगण्याचा
विचार आता करते ....
जीवन इथेच थांबलं बघ माझं
आता मरन्याचा विचार करते .....
11. सगळ्यान मध्ये तू असलास तरी
सगळ्यान मध्ये तू असलास तरी
माझ्यासाठी तू ख़ास आहेस ....
माझे कड़क नियम दुसर्यांसाठी
तुला सगळ माफ आहे ......
12. शहाणं बनण्यापेक्षा मला
शहाणं बनण्यापेक्षा मला
वेडं व्हायला आवडेल
तुझ्या सारख्या (दिड ) शहाण्यावर
विश्वास ठेवायला आवडेल .....
13. जगणं असह्य झाल्यावर
जगणं असह्य झाल्यावर
मरणही उशिरा येते
दुःख अजुन बाकी आहे
हे तेव्हा कळून येते
14. डोळ्यातून अश्रु ओघळला
डोळ्यातून अश्रु ओघळला
की तोही आपला राहत नाही
वाईट याचंच वाटतं की
दु:ख त्याच्या सोबत वाहत नाही।
15. तुझ्या विषयी बोलताना
तुझ्या विषयी बोलताना
मी ज़रा विचार करते
माझ्याशिवाय कोणी नसेल
याची मी खात्री करते .....
16. तू मला फसवणार होतास कधीतरी
तू मला फसवणार होतास कधीतरी
हे आधीच मला माहीत होत
पण बर झाल मला अद्दल घडली
हे मनच माझ मानत नव्हत ........
17. घरात काळोख शिरेल म्हणुन
घरात काळोख शिरेल म्हणुन
मी सगळी दारं लावून बसलो
आणि स्वत:च्या खुळेपनावर
अंधारात बसून हसलो.....
18. तुझ्या आठवणी आठवण्याचा
तुझ्या आठवणी आठवण्याचा
रोग लागलाय मला
तुझ्याकडचं विसरण्याच
औषध दे मला
19. तुझ्या पासून दूर जाताना
तुझ्या पासून दूर जाताना
मन जड़ झाले होते
चेहरा हसरा दाखवला तरी
डोळे भरून आले होते ...
20. मला हव्या असणा-या व्यक्तिंपैकी
मला हव्या असणा-या व्यक्तिंपैकी
तू एक आहेस ....
पण तुझी इच्छा मी का करू ???
तू तर माझाच आहेस....
21. प्रेम करायचाच म्हटल तर
प्रेम करायचाच म्हटल तर
कुनाशिही जमत नाही
मनासारख्या जोड़ी दाराशिवाय
संसारात मन रमत नाही
22. कदाचित म्हणताना माणूस
कदाचित म्हणताना माणूस
नशिबावर अवलंबून असतो
हजारदा त्याच्याकडून फसुन
हित्याच्यावरच विश्वास ठेवतो
23. ओळखिच्या माणसाने
ओळखिच्या माणसाने
ओळखल्या सारखं वागायचं
कारण शोधून बोलन्यापेक्षा
कारनाशिवाय बोलायचं....
24. दिवेलागण वणव्यासारखी पसरते
दिवेलागण वणव्यासारखी पसरते
रात्र झाल्यावर
पण आपलं घर मात्र उजळतं
तू दाराशी आल्यावर
25. रात्रं पटकन सरते
रात्रं पटकन सरते
तुला उराशी धरून
मग दिवसभर तुला पहात राहते
मी परक्यासारखं दुरून
26. आभाळ बरसताना
आभाळ बरसताना
सरळ दार लावून घ्यावं
नाहीतर स्वत:ला
दिशाहीन जाऊ द्यावं
27. पाऊस म्हणजे खरं सांगतो
पाऊस म्हणजे खरं सांगतो
परीक्षा असते स्वत:ची
किती गोष्टींची कबुली
आपण देत राहतो स्वत:शी
28. कुठून तरी येउन
कुठून तरी येउन
पाऊस ईथला होउन जातो
आणि माझ्यासोबत मी बनुन
तो हलवा होउन पहातो
29. वेड्या क्षणी भास् होतो
वेड्या क्षणी भास् होतो
तू जवळ असल्याचा
डोळे उगीच दावा करतात
तू स्पष्ट दिसल्याचा
30. पाऊस एकदाचा पडून जातो
पाऊस एकदाचा पडून जातो
पावसाचे दिवस असले की
आसवांचं तसं नसतं, ते पुन्हा येतात
एकदा डोळे पुसले की
31. पावसावरच्या निबंधाला
पावसावरच्या निबंधाला
कधीच पूर्ण मार्क मिळत नाहीत
कारण मार्क देणारा आणि घेणारा
दोघांनाही तो कळत नाही
32. श्रवण म्हणजे मला वाटतं
श्रवण म्हणजे मला वाटतं
प्राजक्ताचे दिवस
स्रुष्टिने कधीतरी करून
फेडलेला नवस
33. शब्द हा शेवटचा उपाय आहे
शब्द हा शेवटचा उपाय आहे
प्रश्नांचं उत्तर मिळायला
नाहीतर एक कटाक्ष पुरतो
मनातलं गुज कळायला
34. मनाची तहान
मनाची तहान
पाण्यानं भागत नाही
हे बरं आहे की सगळ्यानाच
मनाची तहान लागत नाही
35. मला एक सुखी माणूस
मला एक सुखी माणूस
त्याची दु:ख सांगत बसला
आणि माझा दाटून आलेला अश्रु
मी निमुटपणे पुसला
36. त्याच्याकडे काय मागायचं
त्याच्याकडे काय मागायचं
हेच आपल्याला कळत नाही
म्हणुन बाकी सगळ मिळत राहतं
नेमकं जे हवं त्या कधी मिळत नाही
37. पुढे अथांग पसरलेला सागर
पुढे अथांग पसरलेला सागर
मागे पसरलेला माझा गाव
मधे मी ठिपक्या एवढा
तरी मला माझं असं नाव
38. पहाटेआधी जाग येणं
पहाटेआधी जाग येणं
किती त्रासदायक असतं
सोसून झालेलं आयुष्य
उघड्या डोळ्याना दिसतं
39. एक निरंतर प्रवास सुरु होतो
एक निरंतर प्रवास सुरु होतो
माझ्याकडून माझ्याकडे
आणि तुला वाटतं मी निघालो
पाठ फिरवून तुझ्याकडे
40. तू क्षितिजासारखा......
तू क्षितिजासारखा......
जवळ यायला लागलं की लांब राहतोस
आणि यायचं थांबलं की
आशेने पाहतोस
(विनंती: आधीच्या आणि आज दिलेल्या चारोळ्या मिळून काही चारोळ्या काही दोनदा आल्या असतील तर त्याबद्दल मला क्षमा करा)
Marathi Charolya : संगत
दिवसा वरती दिवस उलटले
आठवीनीच्या संगती
जीवन हे असेच संपले
अपुर्या इच्छा संगती
आयुष्च तर पूर्ण झाले
पण अधुर्या नात्यां संगती
Marathi Kavita : उशीर झाला हे तुला कळण्यासाठी...
उशीर झाला हे तुला कळण्यासाठी...
का तुझा विचार आला पुन्हा छळण्यासाठी
का असा थांबुन गेलो जरा वळण्यासाठी...
भुललो ना मी कधी कोणत्याच अमिषाला
दिला होता तुला 'तो' शब्द पाळण्यासाठी...
वाचले असतेस तु कधी पान माझ्या मनाचे
नसता का तुझा विचार आला पुन्हा छळण्यासाठी
का असा थांबुन गेलो जरा वळण्यासाठी...
उशीर झाला हे तुला कळण्यासाठी...
-
Sagar Sawant
Monday, 25 August 2008
Marathi Charolya : तुझा हात सोडतांना, भावनाना कागदावर उमटवणे
तुझा हात सोडतांना..
भावनाना कागदावर उमटवणे
मनातले त्याला कळले असते
प्रेमाची शाल आंगवर घेऊन
माझी कहाणी एकूण
तुझ्या केसतील फूल
तुझा हात सोडतांना
आभाळ भरलं होतं
गेला देहातून प्राण
प्रेत माझं उरलं होतं
भावनाना कागदावर उमटवणे
भावनाना कागदावर उमटवणे
तितकेसे सोपे नसते
अश्रुना लापवन्या इतके
ते सुद्धा कठिन असते ........
मनातले त्याला कळले असते
मनातले त्याला कळले असते
तर शब्द जोडावे लागले नसते
शब्द जोड़ता जोड़ता जग
सोडावे लागले नसते ..............
प्रेमाची शाल आंगवर घेऊन
प्रेमाची शाल आंगवर घेऊन
शरीर माज़े सवस्थ ज़ोपते
पण शाली ची उब आसूनही
ह्रदय माज़े का धढधढ तय..........
माझी कहाणी एकूण
माझी कहाणी एकूण
आज तो ही राडला
लोक मात्र मणाली
अरे आज पाउस कसा पडला...............
तुझ्या केसतील फूल
तुझ्या केसतील फूल
सारखा मुसू मुसू रडत होते,
कारण काही झाले तरीही
ते तुज्यापेक्षा सुंदर दिसत नवते...........
Sunday, 24 August 2008
Marathi Kavita : तुला लाजण्याच कारणच काय?
तुला लाजण्याच कारणच काय ?
स्वप्नात अजुन मी आलोच कुठे ?
तुला भ्यायचं कारणच काय ?
अजुन तुही अगदी दूर माझ्या ?
तुला शंकेच कारणाच काय ?
अजुन नजरेला नजर भिडलीच कुठे ?
तुझ्या गालांवर गुलाबाच कारणच काय ?
अजुन हनुवटी तुझी, मी उचललीच कुठे ?
डोळे बंद करण्याचे कारणच काय ?
अजुन हातात हात तुझा घेतलाच कुठे ?
तुला नजर झुकवण्याच कारणच काय ?
अजुन ओठांना ओठ भिडलेच कुठे ?
तुला लाजण्याच कारणच काय ?
Marathi Joke : शिक्षक, मुले (Teacher & student)
शिक्षक :- तुम्हि सगळे जण का हसताय?
मुले :- काहि नाहि सर.....
शिक्षक :- खर सांगा मलाच बघुन हसताय ना?
मुले :- नाहि सर.....
शिक्षक :- मग दुसरे वर्गात हसण्यासारखे काय आहे?
मुले :- काहि नाहि सर.....
शिक्षक :- खर सांगा मलाच बघुन हसताय ना?
मुले :- नाहि सर.....
शिक्षक :- मग दुसरे वर्गात हसण्यासारखे काय आहे?
Marathi Joke : स्त्रियांच्या मैत्रीपेक्षा पुरुषांची मैत्री
स्त्रियांच्या मैत्रीपेक्षा पुरुषांची मैत्री अधिक घट्ट असते.
एक बायको एकदा संपूर्ण रात्रभर घरीच येत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी नवरा विचारतो, तेव्हा ती सांगते, "अरे, मी एका मैत्रिणीच्या घरी राहिले होते."
नवऱ्याचा तिच्या शब्दांवर विश्वास बसत नाही. तो तिच्या सर्वात जवळच्या १० मैत्रिणींना फोन करतो. त्याची बायको आपल्याकडे आली नव्हती, असंच दहाहीजणी सांगतात.
आता जेव्हा एक नवरा संपूर्ण रात्रभर घरीच येत नाही, तेव्हा काय होते पाहा. दुसऱ्या दिवशी सकाळी बायको विचारते, तेव्हा तो सांगतो, ''अगं मी माझ्या एका मित्राच्या घरी राहिलो होतो.''
बायकोचा नवऱ्यावर विश्वास बसत नाही. ती त्याच्या सर्वात जवळच्या १० मित्रांना फोन करते. त्यांतले पाचजण छातीठोकपणे सांगतात की काल रात्री तो त्याच्याच घरी होता. उरलेले पाचजण तर, आत्ताही तो आपल्या घरातच आहे असंही सांगून टाकतात!!!
एक बायको एकदा संपूर्ण रात्रभर घरीच येत नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी नवरा विचारतो, तेव्हा ती सांगते, "अरे, मी एका मैत्रिणीच्या घरी राहिले होते."
नवऱ्याचा तिच्या शब्दांवर विश्वास बसत नाही. तो तिच्या सर्वात जवळच्या १० मैत्रिणींना फोन करतो. त्याची बायको आपल्याकडे आली नव्हती, असंच दहाहीजणी सांगतात.
आता जेव्हा एक नवरा संपूर्ण रात्रभर घरीच येत नाही, तेव्हा काय होते पाहा. दुसऱ्या दिवशी सकाळी बायको विचारते, तेव्हा तो सांगतो, ''अगं मी माझ्या एका मित्राच्या घरी राहिलो होतो.''
बायकोचा नवऱ्यावर विश्वास बसत नाही. ती त्याच्या सर्वात जवळच्या १० मित्रांना फोन करते. त्यांतले पाचजण छातीठोकपणे सांगतात की काल रात्री तो त्याच्याच घरी होता. उरलेले पाचजण तर, आत्ताही तो आपल्या घरातच आहे असंही सांगून टाकतात!!!
Thursday, 21 August 2008
Marathi Joke : संता बंता ( Doctor )
बंता : काय रे तू तर डॉक्टरला भेटायला जाणार होता ना, मग त्याचे काय झाले.
संता : अरे यार उद्या जाईल, आज थोडी तब्ब्यत खराब आहे.
संता : अरे यार उद्या जाईल, आज थोडी तब्ब्यत खराब आहे.
Marathi Kavita : अर्ध्यसत्य ठरले ते
कळत होते जवळ येताना
की हे सुख क्षणिक आहे
वळत नाही अजूनही
की हे दु:ख क्षणिक नाही
तू म्हनालीस मी
तुला कधी विसरणार नाही
मी म्हणालो
मीही कधी तुला विसरणार नाही
अर्ध्यसत्य ठरले ते
कारण मी तुला विसरलोच नाही...
की हे सुख क्षणिक आहे
वळत नाही अजूनही
की हे दु:ख क्षणिक नाही
तू म्हनालीस मी
तुला कधी विसरणार नाही
मी म्हणालो
मीही कधी तुला विसरणार नाही
अर्ध्यसत्य ठरले ते
कारण मी तुला विसरलोच नाही...
Wednesday, 20 August 2008
Marathi Kavita : मिळत नसते मागून ...
पुन्हा पुन्हा तेच सागेन
गीत माझे गाउ नकोस...
तेच शब्द तोच ताल
पुन्हा पुन्हा धरू नकोस...
मन माझे जपण्यासाठी
तेच सूर छेडू नकोस...
दिले नाही प्रेम म्हणून
उगीच रागे भरू नकोस...
मिळत नसते प्रेम मागून
उगीच आसु गळु नकोस !!!
कवी : चेतन बच्छाव
भ्रमण ध्वनी : ९८६०१०११३२
गीत माझे गाउ नकोस...
तेच शब्द तोच ताल
पुन्हा पुन्हा धरू नकोस...
मन माझे जपण्यासाठी
तेच सूर छेडू नकोस...
दिले नाही प्रेम म्हणून
उगीच रागे भरू नकोस...
मिळत नसते प्रेम मागून
उगीच आसु गळु नकोस !!!
कवी : चेतन बच्छाव
भ्रमण ध्वनी : ९८६०१०११३२
Marathi Kavita : फक्त तुझ्याचसाठी आजही
फक्त तुझ्याचसाठी आजही माझी लेखणी झिजत आहे.......
कविता लिहायला बसलो की हातच पुढे सरकत नाही
डोळ्यातले अश्रू पाहुन लेखणीतुन शाईसुध्दा सांडत नाही
किती माझ्या भावना सांगु, किती आता विचार मांडू
तुझ्या आठवणींच्या पावसात पुन्हा पुन्हा किती भिजू
येते येते म्हणत तु नेहमीच अशी निघून जातेस
स्वप्नातुन जागा करुन पुन्हा मला एकटा पाडतेस
आता पुरता थकलो आहे तुझी वाट पाहून
तरीसुध्दा तुझ्याच वाटेवर बसलोय डोळे लाऊन
माझं काय विचारतेस आता माझी कविताही थकली आहे
फक्त तुझ्याचसाठी आजही माझी लेखणी झिजत आहे.......
कविता लिहायला बसलो की हातच पुढे सरकत नाही
डोळ्यातले अश्रू पाहुन लेखणीतुन शाईसुध्दा सांडत नाही
किती माझ्या भावना सांगु, किती आता विचार मांडू
तुझ्या आठवणींच्या पावसात पुन्हा पुन्हा किती भिजू
येते येते म्हणत तु नेहमीच अशी निघून जातेस
स्वप्नातुन जागा करुन पुन्हा मला एकटा पाडतेस
आता पुरता थकलो आहे तुझी वाट पाहून
तरीसुध्दा तुझ्याच वाटेवर बसलोय डोळे लाऊन
माझं काय विचारतेस आता माझी कविताही थकली आहे
फक्त तुझ्याचसाठी आजही माझी लेखणी झिजत आहे.......
Marathi Kavita : साजं टळून गेल्यावर
पाखरे परत येतील साजं टळून गेल्यावर
मेघ दाटून येतील उंन पोळून गेल्यावर
सरी धावून येतील रानं जळून गेल्यावर
सुखही परत येईल दु:खं छ्ळून गेल्यावर.
होतील मार्ग मोकळे वळणं टळून गेल्यावर
शब्द टोचतील मनाला ते बोलून गेल्यावर
भिजतील डोळे तुझे, माझे सुकून गेल्यावर
पुन्हां तु ही परत येशील मी दूर गेल्यावर.
झोप धावून येईल स्वप्नं जळून गेल्यावर
कळ्तील तुला चुका पण मी माफ़ केल्यावर
कळेल प्रेम तुला विरहात मन पिळून गेल्यावर
तुही धावून येशील मी राखेत मिळून गेल्यावर.
आठवण माझीही येईल मी विसरून गेल्यावर
पुन्हां तु शोधशील खुणा राखही उडून गेल्यावर
तुझ्याही डोळ्यात आसवे ओघळतील कधी
पण माझ्या कविता तुझ्यापुढे रडून गेल्यावर
मेघ दाटून येतील उंन पोळून गेल्यावर
सरी धावून येतील रानं जळून गेल्यावर
सुखही परत येईल दु:खं छ्ळून गेल्यावर.
होतील मार्ग मोकळे वळणं टळून गेल्यावर
शब्द टोचतील मनाला ते बोलून गेल्यावर
भिजतील डोळे तुझे, माझे सुकून गेल्यावर
पुन्हां तु ही परत येशील मी दूर गेल्यावर.
झोप धावून येईल स्वप्नं जळून गेल्यावर
कळ्तील तुला चुका पण मी माफ़ केल्यावर
कळेल प्रेम तुला विरहात मन पिळून गेल्यावर
तुही धावून येशील मी राखेत मिळून गेल्यावर.
आठवण माझीही येईल मी विसरून गेल्यावर
पुन्हां तु शोधशील खुणा राखही उडून गेल्यावर
तुझ्याही डोळ्यात आसवे ओघळतील कधी
पण माझ्या कविता तुझ्यापुढे रडून गेल्यावर
Marathi Kavita : तव प्रीतीने मी घायाळ झाले
तव प्रीतीने मी घायाळ झाले,
नयन बाणांनी तव, मजला बेहोश केले.
तुझिया कवेत विसवताना,
क्षणही गोठला.
तुझ्या श्वासांचे संगीत,
ऐकण्यासाठी काळही थांबला.
तू ओठांवर ओठ टेकतना,
भान न उरले, भान न उरले............ .
तुझीया श्वासात माझा,
श्वास मिसळला.
तुझीया स्पर्शात मला,
स्वर्ग दूर न उरला,
तुझीया ओठांचे अमृत,
मी मनसोक्त प्याले, मनसोक्त प्याले.........
तुझीया स्पर्शाची जादू अजब,
तुझीया श्वासांचं संगीत गजब,
तूच तू चाहुकडे,
काही न उरले, काही न उरले............ ..
नयन बाणांनी तव, मजला बेहोश केले.
तुझिया कवेत विसवताना,
क्षणही गोठला.
तुझ्या श्वासांचे संगीत,
ऐकण्यासाठी काळही थांबला.
तू ओठांवर ओठ टेकतना,
भान न उरले, भान न उरले............ .
तुझीया श्वासात माझा,
श्वास मिसळला.
तुझीया स्पर्शात मला,
स्वर्ग दूर न उरला,
तुझीया ओठांचे अमृत,
मी मनसोक्त प्याले, मनसोक्त प्याले.........
तुझीया स्पर्शाची जादू अजब,
तुझीया श्वासांचं संगीत गजब,
तूच तू चाहुकडे,
काही न उरले, काही न उरले............ ..
Tuesday, 19 August 2008
Marathi Kavita : कधीतरी वाटतं..
कधीतरी वाटतं कुणीतरी सोबत असावं
माझ्याच विचारांनी दिवसाची सुरवात करणारं,
कधीतरी वाटतं कुणीतरी सोबत असावं
होता विरह थोडातरी काळजी घे स्वतःची म्हणणारं
हे सारं बोलताना नकळतपणे दोन आसु गाळणारं
कुणीतरी असावं माझ्या परतीच्या वाटेवर डोळे लावुन बसणारं
काहीही झालंतरी माझा फोन कट न करणारं
आणि बोलणे कुणालाही समजणारही नाही इतक्या सहजतेने बोलणारं
कुणीतरी असावं अश्या माझ्याशी तासंतास गप्पा मारणारं
दिवसभरं माझ्या फोनची आतुरतेने वाट पाहणारं
फोन आल्यावर माझ्यावरं लटके लटके रागवणारं
कुणीतरी असावं मी समजावल्यावर मात्र नचुकता सॉरी म्हणणारं
सुट्टीच्या दिवशी भेटायला यायला सांगणारं
थोडासा तरी उशीर झाला येण्यासाठी तर येरझारया घालणारं
कुणीतरी असावं सोबत आतुरतेने माझी वाटं पाहणारं
माझ्या डोळ्यांतील भाव बोलले नाही तरी जाणणारं
एखाध्या नाजुक भावक्षणी डोळ्यातुन पाणी गाळणारं
-
Sagar Sawant
9960603454
माझ्याच विचारांनी दिवसाची सुरवात करणारं,
कधीतरी वाटतं कुणीतरी सोबत असावं
होता विरह थोडातरी काळजी घे स्वतःची म्हणणारं
हे सारं बोलताना नकळतपणे दोन आसु गाळणारं
कुणीतरी असावं माझ्या परतीच्या वाटेवर डोळे लावुन बसणारं
काहीही झालंतरी माझा फोन कट न करणारं
आणि बोलणे कुणालाही समजणारही नाही इतक्या सहजतेने बोलणारं
कुणीतरी असावं अश्या माझ्याशी तासंतास गप्पा मारणारं
दिवसभरं माझ्या फोनची आतुरतेने वाट पाहणारं
फोन आल्यावर माझ्यावरं लटके लटके रागवणारं
कुणीतरी असावं मी समजावल्यावर मात्र नचुकता सॉरी म्हणणारं
सुट्टीच्या दिवशी भेटायला यायला सांगणारं
थोडासा तरी उशीर झाला येण्यासाठी तर येरझारया घालणारं
कुणीतरी असावं सोबत आतुरतेने माझी वाटं पाहणारं
माझ्या डोळ्यांतील भाव बोलले नाही तरी जाणणारं
एखाध्या नाजुक भावक्षणी डोळ्यातुन पाणी गाळणारं
-
Sagar Sawant
9960603454
गुगलची गोची, ब्लॉगिंगवर प्रश्नचिन्ह
आपल्याला जे काही वाटते ते मोकळेपणानं सांगण्याचा अत्याधुनिक प्रकार म्हणजे ब्लॉगिंग. दिवसेंदिवस लोकप्रिय होत असलेल्या या ब्लॉगिंगवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी एक केस मुंबई हायकोर्टात आली आहे.
बांधकाम व्यवसायाशी संबंधित असलेल्या मुंबईच्या ग्रेमॅक इन्फ्रास्ट्रक्टर इक्विपमेंट अँड प्रोजेक्ट लि. कंपनीने हायकोर्टात एका ब्लॉगरला कोर्टात खेचलंय. पण हा ब्लॉगर पक्का इरसाल आहे. तो ' टॉक्सिक रायटर ' या टोपणनावाने ब्लॉग लिहितो. त्यामुळे त्याचा हा ब्लॉग होस्ट करणा-या आणि जगातील अव्वल वेबकंपनी असलेल्या गुगलललाही कोर्टाच्या पाय-या चढाव्या लागल्या आहेत.
या अज्ञात व्यक्तीने ब्लॉगवर २६ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध केलेल्या एका पोस्टमुळे बदनामी झाल्याचा कंपनीचा दावा आहे. गुगलच्या ' ब्लॉगर ' या सेवेचा वापर करुन ही बदनामी झाल्यामुळे गुगलने या ब्लॉगरची माहिती द्यावी अशी मागणी कंपनीने केली आहे. पण अशी माहिती दिल्याने ब्लॉगिंगच्या संकेतांनाच धक्का लागतो. त्यामुळे ही माहिती कशी द्यायची या धर्मसंकटात गुगल पडले आहे.
गुगल ब्लॉगरने स्वतःची माहिती लपवण्याचा निर्णय घेतल्यास ती सार्वजनिक करणार नाही असे आश्वासन देते. त्यामुळेच अनेक ब्लॉगर मुक्तपणे आपले विचार मांडतात. मात्र या केसच्या निमित्ताने प्रथमच एका ब्लॉगरची माहिती मागवण्यात आली आहे. मुंबई हायकोर्टानही कंपनीची बाजू ऐकून घेऊन गुगलची भारतातील उपकंपनी ' गुगल इंडिया ' ने एक महिन्यात आपली बाजू मांडावी असे सांगितले आहे.
या केसमध्ये गुगलकडून ब्लॉगरची खरी ओळख देण्यात आली तर आजवरच्या ब्लॉगिंगच्या इतिहासातील ही पहिली घटना ठरेल. तसेच जर गुगलने माहिती देण्यास नकार दिला तर भारतात प्रथमच एका ब्लॉगमुळे गुगलवर कारवाई होईल. यामुळे या केसला भारतीय इंटरनेटच्या जगात महत्त्व आले आहे.
Source: Maharashtratimes.com
बांधकाम व्यवसायाशी संबंधित असलेल्या मुंबईच्या ग्रेमॅक इन्फ्रास्ट्रक्टर इक्विपमेंट अँड प्रोजेक्ट लि. कंपनीने हायकोर्टात एका ब्लॉगरला कोर्टात खेचलंय. पण हा ब्लॉगर पक्का इरसाल आहे. तो ' टॉक्सिक रायटर ' या टोपणनावाने ब्लॉग लिहितो. त्यामुळे त्याचा हा ब्लॉग होस्ट करणा-या आणि जगातील अव्वल वेबकंपनी असलेल्या गुगलललाही कोर्टाच्या पाय-या चढाव्या लागल्या आहेत.
या अज्ञात व्यक्तीने ब्लॉगवर २६ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध केलेल्या एका पोस्टमुळे बदनामी झाल्याचा कंपनीचा दावा आहे. गुगलच्या ' ब्लॉगर ' या सेवेचा वापर करुन ही बदनामी झाल्यामुळे गुगलने या ब्लॉगरची माहिती द्यावी अशी मागणी कंपनीने केली आहे. पण अशी माहिती दिल्याने ब्लॉगिंगच्या संकेतांनाच धक्का लागतो. त्यामुळे ही माहिती कशी द्यायची या धर्मसंकटात गुगल पडले आहे.
गुगल ब्लॉगरने स्वतःची माहिती लपवण्याचा निर्णय घेतल्यास ती सार्वजनिक करणार नाही असे आश्वासन देते. त्यामुळेच अनेक ब्लॉगर मुक्तपणे आपले विचार मांडतात. मात्र या केसच्या निमित्ताने प्रथमच एका ब्लॉगरची माहिती मागवण्यात आली आहे. मुंबई हायकोर्टानही कंपनीची बाजू ऐकून घेऊन गुगलची भारतातील उपकंपनी ' गुगल इंडिया ' ने एक महिन्यात आपली बाजू मांडावी असे सांगितले आहे.
या केसमध्ये गुगलकडून ब्लॉगरची खरी ओळख देण्यात आली तर आजवरच्या ब्लॉगिंगच्या इतिहासातील ही पहिली घटना ठरेल. तसेच जर गुगलने माहिती देण्यास नकार दिला तर भारतात प्रथमच एका ब्लॉगमुळे गुगलवर कारवाई होईल. यामुळे या केसला भारतीय इंटरनेटच्या जगात महत्त्व आले आहे.
Source: Maharashtratimes.com
Monday, 18 August 2008
Sunday, 17 August 2008
Marathi Kavita : आनंदीला आनंद म्हणे
आनंदीला आनंद म्हणे,
जाऊ नको तू ये ईकडे,
पाहू नको तू चोहीकडे,
आपण खाऊ हे चारोळे.
आनंदी लाडात म्हणे,
बाजुला आहेत 'कावळे',
बघुन त्यांना मी घाबरते,
कसे खाऊ मी हे चारोळे.
मी असता तू का घाबरते,
चल जाऊ आपण दुसरीकडे,
तिथे न तु त्यांना दीसे,
मग खाऊ आपण हे चारोळे.
नको नको आतां राहुंदे,
झाली वेळ आता मी निघते,
उद्या भेटु आपण मग तिकडे,
मग खाऊ हे चारोळे.
उद्या म्हणता दिवस सरले,
रोज नवीन तिचे बहाणे,
त्याचे त्यालाच कळून चूकले,
आपणच खाल्ले...... ते चारोळे!
-
Sagar Sawant
जाऊ नको तू ये ईकडे,
पाहू नको तू चोहीकडे,
आपण खाऊ हे चारोळे.
आनंदी लाडात म्हणे,
बाजुला आहेत 'कावळे',
बघुन त्यांना मी घाबरते,
कसे खाऊ मी हे चारोळे.
मी असता तू का घाबरते,
चल जाऊ आपण दुसरीकडे,
तिथे न तु त्यांना दीसे,
मग खाऊ आपण हे चारोळे.
नको नको आतां राहुंदे,
झाली वेळ आता मी निघते,
उद्या भेटु आपण मग तिकडे,
मग खाऊ हे चारोळे.
उद्या म्हणता दिवस सरले,
रोज नवीन तिचे बहाणे,
त्याचे त्यालाच कळून चूकले,
आपणच खाल्ले...... ते चारोळे!
-
Sagar Sawant
Marathi Kavita : कधी काळी तुझ्यावर प्रेम करत होतो
कधी काळी तुझ्यावर प्रेम करत होतो
आता अश्रुंवर प्रेम करण्याचे दिवस आलेत
खूप इच्छा होती माझी घर बसवण्याची
बघ आज माझे घर सोडण्याचे दिवस आलेत.
कधी काळी मी तुझ्यावर मरत होतो
आता खरोखर मरण्याचे दिवस आलेत
खूप इच्छा होती मरणं आजमवण्याची
बघ आज इच्छा पुर्ण करण्याचे दिवस आलेत.
कधी काळी माझ्या कविता हसत होत्या
आता कवितांवर रडण्याचे दिवस आलेत
कागदावर माझ्या शब्दांशीवाय काहीच नव्हते
आज शब्दांसोबत अश्रुंचे डागही आलेत.
कधी मनापासुन मनापर्यंत पोहचत होतो
आज डोळ्यातुन ओघळण्याचे दिवस आलेत
तुझ्या सोडून सागळ्याच्यां डोळ्यात आसवे आहेत
बघ आज तुझ्या सुखाचे नाही माझ्या आसवांचे
दिवस आलेत.
-
Sagar Sawant
आता अश्रुंवर प्रेम करण्याचे दिवस आलेत
खूप इच्छा होती माझी घर बसवण्याची
बघ आज माझे घर सोडण्याचे दिवस आलेत.
कधी काळी मी तुझ्यावर मरत होतो
आता खरोखर मरण्याचे दिवस आलेत
खूप इच्छा होती मरणं आजमवण्याची
बघ आज इच्छा पुर्ण करण्याचे दिवस आलेत.
कधी काळी माझ्या कविता हसत होत्या
आता कवितांवर रडण्याचे दिवस आलेत
कागदावर माझ्या शब्दांशीवाय काहीच नव्हते
आज शब्दांसोबत अश्रुंचे डागही आलेत.
कधी मनापासुन मनापर्यंत पोहचत होतो
आज डोळ्यातुन ओघळण्याचे दिवस आलेत
तुझ्या सोडून सागळ्याच्यां डोळ्यात आसवे आहेत
बघ आज तुझ्या सुखाचे नाही माझ्या आसवांचे
दिवस आलेत.
-
Sagar Sawant
Thursday, 14 August 2008
स्वतंत्रता दिवस - स्वातन्त्र्य दीनाच्या शुभेछा ( Happy Independence Day )
१५ ऑगस्ट, १९४७ या दिवसाला प्रत्येक भारतीयाच्या मनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण या दिवशी आपल्याला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळाले. भारत स्वतंत्र झाला. एकच खन्त की आजकाल आपल्यला स्वतन्त्र दीन स्वतन्त्रपने साजरा करता येत नाहि, सगळीकडे दहशतवादाच्या (इस्लामिक, कम्युनिस्ट) छायेमधे साजरा करावा लागतो जणु काहि महान सुरक्शा बन्दोबस्त दीवस साजरा करित आहोत असे वाटतय. आपल्या स्वतन्त्र देशात आपणच सुरक्शीत नाही. तरि जे देशासाठि ज्यानी प्राण वेचले त्याना आणी आपल्या सुरक्शा जवानाना सलाम...
सगळ्याना, स्वातन्त्र्य दीनाच्या शुभेछाHappy Independence Day to all Indians
Marathi Kavita : औंदा लगीन (Aunda lagin)
कवापासनं घरची मागं माह्या लागल्यात…
अतातरी दोनाच, चार कर की म्हणत्यात..
गड्यानॉ, आसल काय बी करायच न्हाय…
नस्त्या झेंगाटात आडकायचं मला न्हाय..
………………………………औंदा लगीन करायच न्हाय.
कुठं राव त्या बायकांच्या नादी लागता…
रोज रोजची कटकट न वटवट, आयला…
ह्ये कर, त्ये आन् रोज मग मरान हाय…
ह्याला बघ,त्याला ने रोजचं ग्रहान हाय…
………………………म्हणून औंदा लगीन करायच न्हाय.
म्या महनतो, भाजी न भाकरी जळाली…
तरी..म्हणावं लागतं काय मस्तच हाय…
मोकळा फिरता येणार न्हाय..नि गावच्या
पोरीकडं बी दिलखुलास बघता येणार न्हाय…
……………………..म्हणूनच औंदा लगीन करायच न्हाय.
बस का, यावर थोडा च भगणाराय सगळं..
त्यानंतरच ‘लचांड’ मग मागचकी लगतय…
बा ह्ये घे,बा त्ये घे एकत आन् करत करत
म्हातरपण पण मग हळूहळू सराय लागतय…
…………..आन् मग म्हणूनच औंदा लगीन करायच न्हाय.
झाकच की, मामाच्या शालीशीच लगीन ठरतय..
बघताय काय आसं? तिच्यात माहा जीव हाय..
वर ज्ये काय म्हनालय़,.. त्ये इसारा की राव….
माणूस बी चुकतोच की कधी, का खाताय भाव?
…………………इचार करतोय औंदा लगीन करावं की काय?
नाय, तसं न्हाय…तिचं नखरं सोशीन म्हणतो….
जळकी भाकरी डोळेझाकून घशाखाली उतरवतो….
गावच्या पोरिमधी…. नाहीतरी ठेवलयच काय?
म्हातारपनाला आपलीच पोरं असणार की न्हाय?
….जाऊ द्या सगळेच म्हनत्यात, तर औंदा लगीन करणार हाय..
Source : Email
अतातरी दोनाच, चार कर की म्हणत्यात..
गड्यानॉ, आसल काय बी करायच न्हाय…
नस्त्या झेंगाटात आडकायचं मला न्हाय..
………………………………औंदा लगीन करायच न्हाय.
कुठं राव त्या बायकांच्या नादी लागता…
रोज रोजची कटकट न वटवट, आयला…
ह्ये कर, त्ये आन् रोज मग मरान हाय…
ह्याला बघ,त्याला ने रोजचं ग्रहान हाय…
………………………म्हणून औंदा लगीन करायच न्हाय.
म्या महनतो, भाजी न भाकरी जळाली…
तरी..म्हणावं लागतं काय मस्तच हाय…
मोकळा फिरता येणार न्हाय..नि गावच्या
पोरीकडं बी दिलखुलास बघता येणार न्हाय…
……………………..म्हणूनच औंदा लगीन करायच न्हाय.
बस का, यावर थोडा च भगणाराय सगळं..
त्यानंतरच ‘लचांड’ मग मागचकी लगतय…
बा ह्ये घे,बा त्ये घे एकत आन् करत करत
म्हातरपण पण मग हळूहळू सराय लागतय…
…………..आन् मग म्हणूनच औंदा लगीन करायच न्हाय.
झाकच की, मामाच्या शालीशीच लगीन ठरतय..
बघताय काय आसं? तिच्यात माहा जीव हाय..
वर ज्ये काय म्हनालय़,.. त्ये इसारा की राव….
माणूस बी चुकतोच की कधी, का खाताय भाव?
…………………इचार करतोय औंदा लगीन करावं की काय?
नाय, तसं न्हाय…तिचं नखरं सोशीन म्हणतो….
जळकी भाकरी डोळेझाकून घशाखाली उतरवतो….
गावच्या पोरिमधी…. नाहीतरी ठेवलयच काय?
म्हातारपनाला आपलीच पोरं असणार की न्हाय?
….जाऊ द्या सगळेच म्हनत्यात, तर औंदा लगीन करणार हाय..
Source : Email
Wednesday, 13 August 2008
Marathi Kavita : वेश्या
रात्र वैरी सरली तिची
अब्रुही लुटली तिची
आता उणे श्वास फक्त
प्राक्तने मिटली तिची
देह व्यापार बास झाला
घरी आहे कोणी आजारी
लेक आक्रंदतो आहे..
पाउले उठली तिची
रोज अत्याचार होतो
रोज निलामी जगाशी
रोज लढतांना स्वतःशी
भावना मरते तिची
वाटते संपुन जावा
जीव एखाद्या क्षणाला
लेकराची हाक येता
आरोळी भिजते तिची
हे असे किती जगावे
पण तरी जगतेच आहे
रोज काटेरी उशाला
रात्र तळमळते तिची !!
आसवे डोळ्यात न्हाली
चेहरा हसरा तरी
आतमध्ये आग होती
ती कशी विझली तिची ??
कवि : संतोष (९८८११५८८४५)
अब्रुही लुटली तिची
आता उणे श्वास फक्त
प्राक्तने मिटली तिची
देह व्यापार बास झाला
घरी आहे कोणी आजारी
लेक आक्रंदतो आहे..
पाउले उठली तिची
रोज अत्याचार होतो
रोज निलामी जगाशी
रोज लढतांना स्वतःशी
भावना मरते तिची
वाटते संपुन जावा
जीव एखाद्या क्षणाला
लेकराची हाक येता
आरोळी भिजते तिची
हे असे किती जगावे
पण तरी जगतेच आहे
रोज काटेरी उशाला
रात्र तळमळते तिची !!
आसवे डोळ्यात न्हाली
चेहरा हसरा तरी
आतमध्ये आग होती
ती कशी विझली तिची ??
कवि : संतोष (९८८११५८८४५)
Tuesday, 12 August 2008
मराठी बोध वाक्ये - Marathi Quote
1. कुणीही कस दीसावं यापेक्षा कसं असावं याला महत्व आहे. ते शक्य नसेल तर जास्तीत जास्त कसं नसावं याला तरी नक्कीच महत्व आहे.
2. पाण्यात राहायचे तर माशंशी नुसती मैत्री करून भागत नाही तर स्वताला मासा बनावे लागते.
3. वादळं जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीला घट्ट रुजुन रहायचं असतं. ती जितक्या वेगाने येतात तितक्याच वेगगने निघून जातात. वादळ महत्वाचे नसते , प्रश्ना असतो आपण त्याच्याशी कशी झुंझ देतो आणि त्यातून कितपत बर्या अवस्थेत बाहेर येतो याचा असतो.
2. पाण्यात राहायचे तर माशंशी नुसती मैत्री करून भागत नाही तर स्वताला मासा बनावे लागते.
3. वादळं जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीला घट्ट रुजुन रहायचं असतं. ती जितक्या वेगाने येतात तितक्याच वेगगने निघून जातात. वादळ महत्वाचे नसते , प्रश्ना असतो आपण त्याच्याशी कशी झुंझ देतो आणि त्यातून कितपत बर्या अवस्थेत बाहेर येतो याचा असतो.
Monday, 11 August 2008
मला आभिमान आहे कारण .......
मला आभिमान आहे कारण .......
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्या एक तो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी
आमुच्या मनामानात दंग ते मराठी
आमुच्या रगरगात रंगते मराठी
आमुच्या उरा उरात स्पंदाते मराठी
आमुच्या नसानसात नाच ते मराठी
आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी
आमुच्या लहानग्यात रांगते मराठी
आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी
आमुच्या घराघरात वाढते मराठी
आमुच्या कुला कुलात नांदते मराठी
येथल्या फुलाफुलात हासते मराठी
येथल्या दिशादिशात दाट ते मराठी
येथल्या नगानगात गर्जते मराठी
येथल्या दरीदरीत हिंडते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या तरुलतात साजते मराठी
येथल्या कळीकळीत लाजते मराठी
येथल्या नभामधून वर्षते मराठी
येथल्या पिकांमधून डोलते मराठी
येथल्या नद्यांमधून वाहते मराठी
येथल्या चराचरात राहते मराठी
पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
आपुल्या घरात हाल सोसते मराठी
हे असे कितीक 'खेळ' पाहते मराठी
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी
मराठी माती चे करुया सोन
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्या एक तो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी
आमुच्या मनामानात दंग ते मराठी
आमुच्या रगरगात रंगते मराठी
आमुच्या उरा उरात स्पंदाते मराठी
आमुच्या नसानसात नाच ते मराठी
आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी
आमुच्या लहानग्यात रांगते मराठी
आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी
आमुच्या घराघरात वाढते मराठी
आमुच्या कुला कुलात नांदते मराठी
येथल्या फुलाफुलात हासते मराठी
येथल्या दिशादिशात दाट ते मराठी
येथल्या नगानगात गर्जते मराठी
येथल्या दरीदरीत हिंडते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या तरुलतात साजते मराठी
येथल्या कळीकळीत लाजते मराठी
येथल्या नभामधून वर्षते मराठी
येथल्या पिकांमधून डोलते मराठी
येथल्या नद्यांमधून वाहते मराठी
येथल्या चराचरात राहते मराठी
पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी
आपुल्या घरात हाल सोसते मराठी
हे असे कितीक 'खेळ' पाहते मराठी
शेवटी मदांध तख्त फोडते मराठी
मराठी माती चे करुया सोन
कुणीतरी आठवण काढतंय!!!
कुणीतरी आठवण काढतंय!!!
हसता हसता डोळे अलगद येतीलही भरुन
बोलता बोलता शब्द ओठी जातीलही विरुन
कावरंबावरं होण्यासारखं बिलकुल काही नाही
रस्त्यामध्ये दिसतातच की चेहरे येता जाता
"एका" सारखेच दिसू लागतील सहज बघता बघता
अवतीभवती सगळीकडे तेच माणूस दिसेल
सृष्टीमध्ये दोनच जीव... आणखी कुणी नसेल
भिरभिरल्यागत होण्यासारखं बिलकुल काही नाही
कुणीतरी आठवण काढतंय, बाकी काही नाही
मोबईल वाजण्याआधीच तो वाजल्यासारखा वाटेल
जुनाच काढुन एसएमएस वाचवासा वाटेल
दिवस सरता वाटत जाईल उगाचच उदास
पावलोपावली जड होत जाईल बहुधा श्वास
घाबरुन बिबरुन जाण्यासारखं बिलकुल काही नाही
कुणीतरी आठवण काढतंय, बाकी काही नाही
जेवता जेवता जीवघेणा लागेलही ठसका
घरचे म्हणतील सारखा कसा लागतो उठता बसता
चेहरा लपवत, डोळे पुसत, पाणी प्यावे थोडे
बोलण्याआधी आवाजाला, सांभाळावे थोडे
सांगुन द्यावं काळजीसारखं बिलकुल काही नाही
"कुणीतरी आठवण काढतंय, बाकी काही नाही
हसता हसता डोळे अलगद येतीलही भरुन
बोलता बोलता शब्द ओठी जातीलही विरुन
कावरंबावरं होण्यासारखं बिलकुल काही नाही
रस्त्यामध्ये दिसतातच की चेहरे येता जाता
"एका" सारखेच दिसू लागतील सहज बघता बघता
अवतीभवती सगळीकडे तेच माणूस दिसेल
सृष्टीमध्ये दोनच जीव... आणखी कुणी नसेल
भिरभिरल्यागत होण्यासारखं बिलकुल काही नाही
कुणीतरी आठवण काढतंय, बाकी काही नाही
मोबईल वाजण्याआधीच तो वाजल्यासारखा वाटेल
जुनाच काढुन एसएमएस वाचवासा वाटेल
दिवस सरता वाटत जाईल उगाचच उदास
पावलोपावली जड होत जाईल बहुधा श्वास
घाबरुन बिबरुन जाण्यासारखं बिलकुल काही नाही
कुणीतरी आठवण काढतंय, बाकी काही नाही
जेवता जेवता जीवघेणा लागेलही ठसका
घरचे म्हणतील सारखा कसा लागतो उठता बसता
चेहरा लपवत, डोळे पुसत, पाणी प्यावे थोडे
बोलण्याआधी आवाजाला, सांभाळावे थोडे
सांगुन द्यावं काळजीसारखं बिलकुल काही नाही
"कुणीतरी आठवण काढतंय, बाकी काही नाही
तुझ्या आणि माझ्यात
तुझ्या आणि माझ्या मैत्रित एक गाठ असवी,
कुठल्याही मतभेदाना तेथे वाट नसावी,
मी आनन्दात असताना हसने तुझे असावे,
तु दुखःत असताना अश्रु माझे असावे,
मी ऎकाकी असताना सोबात तुझी असावी,
तु अबोल असताना शब्द माझे असावे
Sunday, 10 August 2008
प्यार का PC...
अभी अभी तो प्यार का PC किया है चालु
अपने दिल के Hard Disk पे और कितनी Files डालु
अपने चेहरे से रूसवाई की Error तो हटाओ
ऐ जानेमन अपने दिल का Password तो बताओ
वो तो हम है जो आप की चाहत दिल मॆं रखते है
वरना आप जैसे कितने Softwares तो बाज़ार में बिकते है
रोज़ रात आप मेरे सपने में आते हो
मेरे प्यार को Mouse बना के उंगलियों पे नचाते हो
तेरे प्यार का Email मेरे दिल को लुभाता है
पर बीच में तेरे बाप का Virus आ जाता है
और करवाओगे हमसे कितना इन्तजार
हमारे दिल की साईट पे कभी Enter तो मारो यार
आपके कई नखरे अपने दिल पे बैंग हो गये
दो PC जुड़ते जुड़ते Hang हो गये
आप जैसो के लिये दिल को Cut किया करते है
वरना बाकी केसेस में तो Copy Paste किया करते हैं
आपक हँसना आप क चलना आप की वो स्टाईल
आपकी अदाओं की हमने Save कर ली है File
जो सदीयों से होता आया है वो रीपीट कर दुंगा
तु ना मिली तो तुझे Ctrl+Alt+Delete कर दुंगा
लड़कीयां सुन्दर हैं और लोनली हैं
प्रोब्लम है कि बस वो Read Only ह
अपने दिल के Hard Disk पे और कितनी Files डालु
अपने चेहरे से रूसवाई की Error तो हटाओ
ऐ जानेमन अपने दिल का Password तो बताओ
वो तो हम है जो आप की चाहत दिल मॆं रखते है
वरना आप जैसे कितने Softwares तो बाज़ार में बिकते है
रोज़ रात आप मेरे सपने में आते हो
मेरे प्यार को Mouse बना के उंगलियों पे नचाते हो
तेरे प्यार का Email मेरे दिल को लुभाता है
पर बीच में तेरे बाप का Virus आ जाता है
और करवाओगे हमसे कितना इन्तजार
हमारे दिल की साईट पे कभी Enter तो मारो यार
आपके कई नखरे अपने दिल पे बैंग हो गये
दो PC जुड़ते जुड़ते Hang हो गये
आप जैसो के लिये दिल को Cut किया करते है
वरना बाकी केसेस में तो Copy Paste किया करते हैं
आपक हँसना आप क चलना आप की वो स्टाईल
आपकी अदाओं की हमने Save कर ली है File
जो सदीयों से होता आया है वो रीपीट कर दुंगा
तु ना मिली तो तुझे Ctrl+Alt+Delete कर दुंगा
लड़कीयां सुन्दर हैं और लोनली हैं
प्रोब्लम है कि बस वो Read Only ह
Friday, 8 August 2008
Marathi Mhani (मराठी म्हणी) : शब्द - उ,ऊ (u,U)
उंटावरचा शहाणा.
उंदराला मांजराची साक्ष.
उंदीर गेला लुटी आणल्या दोन मुठी.
उघड्याकडे नागडा गेला अनं रात्रभर हिवाने मेला.
उचलली जीभ लावली टाळ्याला.
उठता लाथ, बसता बुक्की.
उडत्या पक्षाची पिसे मोजणे.
उडाला तर कावळा, बुडाला तर बेडुक.
उतावळा नवरा घुडग्याला बाशिंग.
उत्तम शेती, माध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी.
उथळ पाण्याला खळखळाट फार.
उद्योगाचे घरी रिध्दी सिध्दी पाणी भरी.
उधार पाधार वाण्याचा आधार.
उधार तेल खवट.
उधारीचे पोते, सव्वा हात रिते.
उन पाण्याचे घर जळत नसते.
उपट सुळ, घे खांद्यावर.
उभारले राजवाडे तेथे आले नकवडे.
उभ्याने यावे आणि ओणव्याने जावे.
उसना पसारा देवाचा आसरा.
उसळात घातलं तर मुसळात सापडत नाही.
उसाच्या पोटी कापूस.
ऊस गोड लागला म्हणून मुळासगट खावू नये.
ऊस झाला डोंगा परी रस नाही डोंगा.
उंदराला मांजराची साक्ष.
उंदीर गेला लुटी आणल्या दोन मुठी.
उघड्याकडे नागडा गेला अनं रात्रभर हिवाने मेला.
उचलली जीभ लावली टाळ्याला.
उठता लाथ, बसता बुक्की.
उडत्या पक्षाची पिसे मोजणे.
उडाला तर कावळा, बुडाला तर बेडुक.
उतावळा नवरा घुडग्याला बाशिंग.
उत्तम शेती, माध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी.
उथळ पाण्याला खळखळाट फार.
उद्योगाचे घरी रिध्दी सिध्दी पाणी भरी.
उधार पाधार वाण्याचा आधार.
उधार तेल खवट.
उधारीचे पोते, सव्वा हात रिते.
उन पाण्याचे घर जळत नसते.
उपट सुळ, घे खांद्यावर.
उभारले राजवाडे तेथे आले नकवडे.
उभ्याने यावे आणि ओणव्याने जावे.
उसना पसारा देवाचा आसरा.
उसळात घातलं तर मुसळात सापडत नाही.
उसाच्या पोटी कापूस.
ऊस गोड लागला म्हणून मुळासगट खावू नये.
ऊस झाला डोंगा परी रस नाही डोंगा.
Marathi Mhani (मराठी म्हणी) : शब्द इ, ई (e,E)
- इकडून तिकडून सगळे सारखे.
- इकडे आड़ तिकडे विहीर.
- इच्छा तसे फळ.
- इच्छिलेले जर घडले असते तर भिक्षुकांते राजे होते.
- इजा बिजा तीजा.
- ईडा पिडा टळो आणि बळीचे राज्य येवो.
- ईश्वर जन्मास घालतो त्याचे पदरी शेर बांधतो.
Wednesday, 6 August 2008
Marathi Mhani (मराठी म्हणी) : शब्द अ, आ (A)
- अंगात नाही बळ आणि चिमटा घेउन पळ.
- अंगापेक्षा बोंगा जास्ती.
- अंगाले सुटली खाज, हाताले नाही लाज.
- अंगावर आल्या गोणी तर बळ धरले पाहिजे टुणी.
- अंगावरचे लेणे, जन्मभर देणे.
- अंथरूण पाहून पाय पसरावेत.
- अंधळं दळतं अऩ कुत्र पिठ खातं.
- अंधारात केले पण उजेडात आले.
- अंधेर नगरी चौपट राजा.
- अक्कल नाही काडीची नाव सहस्त्रबुद्धे.
- अक्कल खाती जमा.
- अक्कल नाही काडीची म्हणे बाबा माझे लग्नं करा.
- अग अग म्हशी, मला कुठे गं नेशी.
- अग माझे बायले, सर्व तुला वाटिले.
- अघटित वार्ता आणि कोल्हे गेले तीर्था.
- अघळ पघळ अन घाल गोंधळ.
- अठरा विश्व दारिद्र त्याला छत्तीस कोटी उपाय.
- अडला हरी गाढवाचे पाय धरी.
- अडली गाय खाते काय.
- अडाण्याचा गेला गाड़ा, वाटेवरची शेते काढा.
- अडाण्याची मोळी, भलत्यासच मिळी.
- अड्क्याची भवानी सपिकेचा शेंदूर.
- अढीच्या दिढी सावकाराची सढी.
- अती केला अनं मसनात गेला.
- अती झालं अऩ हसू आलं.
- अती झाले गावचे अन पोट फुगले देवाचे.
- अती तिथं माती.
- अती परीचयात आवज्ञा.
- अती राग भीक माग.
- अती शहाणा त्याचा बैंल रिकामा.
- अत्युची पदि थोरही बिघडतो, हा बोल आहे खरा.
- अनुभवल्याशिवाय कळत नाही चावल्याशिवाय गिळत नाही.
- अपयश हे मरणाहून वोखटे.
- अपापाचा माल गपापा.
- अप्पा मारी गप्पा.
- अर्ध्या गावाची नाही खबर आणि वाटणीला बरोबर.
- अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे.
- अल्प बुध्दी, बहु गर्वी.
- अळवाची खाज़ अळवाला ठाऊक.
- अळी मिळी गुपचिळी.
- अवघड ठिकाणी दुखणे आणि जावई डॉक्टर.
- अव्हाधसा पोर, घर राखण्यात थोर.
- असंगाशी संग आणि प्राणाशी गाठ.
- असतील चाळ तर फिटतील काळ.
- असतील मुली तर पेटतील चुली.
- असतील शिते तर जमतील भूते.
- असून अडचण नसून खोळांबा.
- असेल तेव्हा दिवाळी नसेल तेव्हा शिमगा.
- असेल दाम तर होईल काम.
- असेल ते विटवा, नसेल ते भेटवा.
- असेल हरी तर देईल खाटल्यावरी.
- आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे.
- आंधळी पाण्याला गेली घागर फोडून घरी आली.
- आंधळीपेक्षा तिरळी बरी.
- आई भाकर देत नाही अऩ बाप भिक मागू देत नाही.
- आई म्हणते लेक झाले, भाऊ म्हणतात वैंरी झाले.
- आईचा काळ, बायकोचा मवाळ.
- आईची माया अन पोर जाईला वाया.
- आऊचा काऊ तो म्हणे मावसभाऊ.
- आखाड्याच्या मेळावात पहेलवानाची किंमत.
- आग रामेश्वरी अऩ बंब सोमेश्वरी.
- आग लागल्यावर विहीर खणणे.
- आगीशिवाय धूर दिसत नाही.
- आचार भ्रष्टी, सदा कष्टी.
- आज अंबारी, उद्या झोळी धरी.
- आजा मेला, नातू झाला.
- आठ हात लाकुड, नऊ हात धलपी.
- आडजीभ खाई अऩ पडजीभ बोंबलत जाई.
- आडात नाही तर पोऱ्ह्यात कोठून?
- आत्याबाईला मिश्या असत्या तर काका म्हटलो नसतो.
- आधणातले रडतात, सुपातले हसतात.
- आधी करा मग भरा.
- आधी करावे मग सांगावे.
- आधी करी सुन सुन, मग करी फुणफुण.
- आधी गुंतू नये, मग कुंथु नये.
- आधी जाते अक्कल मग सुचते शहाणपण.
- आधी नमस्कार मग चमत्कार.
- आधी पोटोबा, मग विठोबा.
- आधी होता वाघ्या, मग झाला पाग्या, त्याचा स्वभाव जाईना, त्याचा येळकोट राहीना.
- आधीच उल्हास त्यातून फाल्गुन मास.
- आधीच दुष्काळ त्यातून ठणठण गोपाळ.
- आधीच नव्हती हौस त्यात पडला पाऊस.
- आधीच मर्कट त्यातून मद्य प्याले, त्याची क्रिडा काय विचारता?
- आपण आपल्याच सावलीला भितो.
- आपण आरे म्हटले की कारे आलेच.
- आपण करु तो चमत्कार, दुसऱ्याचा तो बलात्कार.
- आपण शेण खायचं नि दुसऱ्याचं तोंड हुंगायच.
- आपण सुखी तर जग सुखी.
- आपलंच घर, हागुन भर.
- आपला आळी, कुत्रा बाळी.
- आपला तो बाळ्या, दुसऱ्याचा तो कार्ट्या.
- आपला हात, जग्गन्नाथ.
- आपली ठेवायची झाकून अऩ दुसऱ्याची पहायची वाकून.
- आपली पाठ आपल्याला दिसत नाही.
- आपलीच मोरी अनं अंघोळीची चोरी.
- आपले ठेवायचे झाकून अन दुसऱ्याचे पहायचे वाकून.
- आपले ते प्रेम, दुसऱ्याचे ते लफडे.
- आपले नाक कापून दुसऱ्याला अपशकुन.
- आपले नाही धड नाही शेजाऱ्याचा कढ.
- आपलेच दांत अऩ आपलेच ओठ.
- आपल्या कानी सात बाळ्या.
- आपल्या डोळ्यातले मुसळ दिसत नाही पण दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ दिसते.
- आपल्या ताटातले गाढव दिसत नाही पण दुसऱ्याच्या ताटातली माशी दिसते.
- आपल्या हाताने आपल्याच पायावर दगड.
- आभाळ फाटल्यावर ढिगळ कुठे कुठे लावणार?
- आयजीच्या जीवावर बायजी उदार, सासूच्या जीवावर जावई उदार.
- आयत्या बिळात नागोबा.
- आराम हराम आहे.
- आरोग्य हीच धनसंपत्ती.
- आलथा पसा, पालथा पसा, माकडा तुझा संसार कसा?
- आला भेटीला धरला वेठीला.
- आली अंगावर, घेतली शिंगावर.
- आली चाळीशी, करा एकादशी.
- आली सर तर गंगेत भर.
- आलीया भोगासी असावे सादर.
- आले मी नांदायला, मडके नाही रांधायला.
- आळश्या उळला अऩ शिंकरा शिंकला.
- आळश्याला दुप्पट काम.
- आळी ना वळी सोनाराची आळी.
- आळ्श्याला गंगा दूर.
- आवडतीचा शेंबुड गोड आणि नावडतीचे मीठ आळणी.
- आवडीने केला वर त्याला दिवसा खोकला रात्री ज्वर.
- आवडीने केला वार त्याला दिवसा खोकला आणि रात्री ज्वर.
- आवळा देवून भोपळा काढणे. (आवळा देवून कोहळा काढणे.)
- आवसबाई तुझ्याकडे पुतनबाई माझ्याकडे
- आशा सुटेना अन देव भेटेना.
- आसू ना मासू, कुत्र्याची सासू.
- ओ म्हणता ठो येईना.
- ओठात एक आणि पोटात एक.
- ओठी ते पोटी.
- ओल्या बरोबर सुके जळते.
- ओळख ना पाळख अनं मला म्हणा लोकमान्य टिळक.
- ओसाड गावी एरंडी बळी.
- औटघटकेचे राज्य.
- औषधावाचून खोकला गेला.
Tuesday, 5 August 2008
मराठी चारोळ्या
1) मनातील भावनाना मर्यादा नसतात
मनातील भावनाना मर्यादा नसतात
त्या असतात असीम आणि अथांग
त्या तू लगेच जाणून घेतोस
आणि उधलून देतोस सारे रंग ......
2) मनात सारे असतानाही
मनात सारे असतानाही
ओठावर का उमटत नाही
शब्दच रुसून बसले की
मीच खुळी मज उमजत नाही...........
3) माज्या स्वप्नातल आयुष्य मी
माज्या स्वप्नातल आयुष्य मी
आंदन म्हणुन तुला दिल
कारण तुज्यापलिकडे सुद्धा जग आहे
हे मला तेव्हा नाही कळल
4) क्षणाची सोबत आणि अथांग एकटेपाना
क्षणाची सोबत आणि अथांग एकटेपाना
याची आठवण पावसामुलेच जाली
तुला ही विसरली होती मी
तुजी आठवण सुद्धा मला पावसानेच करून दिली
5) महितेय तुज्या नजरेताच
महितेय तुज्या नजरेताच
तुज्या भावना आहेत
पण तुज्या नजरेला माजी
नजर कधी भिडत नाही
आणि तुज्या मनातील भावना
मला कधी कळत नाही ........
मनातील भावनाना मर्यादा नसतात
त्या असतात असीम आणि अथांग
त्या तू लगेच जाणून घेतोस
आणि उधलून देतोस सारे रंग ......
2) मनात सारे असतानाही
मनात सारे असतानाही
ओठावर का उमटत नाही
शब्दच रुसून बसले की
मीच खुळी मज उमजत नाही...........
3) माज्या स्वप्नातल आयुष्य मी
माज्या स्वप्नातल आयुष्य मी
आंदन म्हणुन तुला दिल
कारण तुज्यापलिकडे सुद्धा जग आहे
हे मला तेव्हा नाही कळल
4) क्षणाची सोबत आणि अथांग एकटेपाना
क्षणाची सोबत आणि अथांग एकटेपाना
याची आठवण पावसामुलेच जाली
तुला ही विसरली होती मी
तुजी आठवण सुद्धा मला पावसानेच करून दिली
5) महितेय तुज्या नजरेताच
महितेय तुज्या नजरेताच
तुज्या भावना आहेत
पण तुज्या नजरेला माजी
नजर कधी भिडत नाही
आणि तुज्या मनातील भावना
मला कधी कळत नाही ........
Subscribe to:
Posts (Atom)